मुंबई

मुंबईची जीवनशैली देशात एक नंबर! पुणे देखील आहे एका महत्त्वाच्या बाबतीत 'टॉप'वर

सुमित बागुल

मुंबई : भारतात राहणीमानाच्या दृष्टीने, जीवनशैलीमध्ये कोणतं शहर सर्वात उत्तम आहे, हे तुम्ही कुणाला विचारलं तर तुम्हाला विविध उत्तरं मिळतील. याबाबत IIT मुंबईद्वारा एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनातून मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

IIT बॉम्बेद्वारा भारतातील विविध शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये लाइफस्टाईलच्या बाबतीत मुंबईचा पहिला क्रमांक लागला आहे. पुणेकरांसाठी देखील एक आनंदाची बातमी या संशोधनातून समोर आली आहे. देशातील साक्षर महानगरांच्या गटामध्ये पुण्याच्या पहिला नंबर लागलाय. 

चौदा विविध शहरांचा अभ्यास

शहरांची 'लाइफस्टाईल' या गटामध्ये संशोधन करताना देशातील चौदा विविध शहरांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये मुंबई एक नंबरवर तर त्याखालोखाल दिल्ली, कोलकाता या शहरांचा क्रमांक लागतो. पहिल्यांदाच शहरांच्या विविध छटांबाबत संशोधन करताना लैंगिक समानतेचा देखील विचार करण्यात आला. यामध्ये चेन्नईचा पहिला क्रमांक लागतोय. चेन्नई मागोमाग मुंबई आणि कोलकाता शहरे अनुक्रमके दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. लैंगिक समानतेच्या बाबत बिहारची राजधानी पाटणा सर्वात तळाला आहे.  

पुण्याला ९१ टक्के मते

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे साक्षर महानगरांच्या यादीत पुण्याला ९१ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे साक्षर महानगरांच्या यादीत पुणे अव्वल ठरलं आहे. तर संपूर्ण देशात चेन्नई हे महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर असल्याचं या संशोधनातून समोर आलंय. महिलांशी निगडीत गुन्हे होण्याचे प्रमाण जयपूरमध्ये सर्वात जास्त असल्याची बाब समोर आली आहे. 

IIT bombay reserch says mumbais lifestyle is best in India

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT