Egg  File photo
मुंबई

मुंबईत प्रतिडझन अंड्यांचा दर ८० रुपये

कोरोनालाटेमुळे अंड्यांच्या मागणीत वाढ

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोना संसर्ग वाढल्याने अंड्यांची मागणी वाढली आहे. परिणामी अंड्यांचा दर डझनामागे 10 ते 12 रुपयांनी वाढला असून घाऊक बाजारात 4 रुपये 65 पैश्यांना मिळणारे अंडे किरकोळ बाजारात 7 रुपयांपर्यंत महागले आहे. मुंबईला दिवसाला 1 कोटी 80 हजारांच्या वर अंड्यांचा पुरवठा होत होता. त्यात आता वाढ होऊन 2 कोटी 25 लाखांवर पोहोचला आहे. साधारणता मार्च ते मे च्या दरम्यान अंड्यांची मागणी ही कमी होते. त्यामुळे अंड्यांचा दर प्रति अंड 5 रूपयांपर्यंत खाली घसरतो. यावर्षी मात्र नेमके उलटे झाले असून भर उन्हाळ्यात अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. कोरोना संसर्ग वाढल्याने पौष्टिक आहार घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पौष्टिक आहार म्हणून अंड्याकडे बघितले जात असून अंड्यांची मागणी वाढली असल्याचे पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अजित रानडे यांनी सांगितले.

अंड्यांची मागणी वाढल्याने त्याचा परिणाम अंड्यांचा पुरवठा आणि किमतींवर झाला आहे. वाढत्या मागणीमुळे परराज्यातून अंडी मागवण्यात येत असून त्यामुळे आता पुन्हा एकदा अंड्यांचा पुरवठा वाढला आहे. यासह अंड्यांचा दर ही वाढला असून गेल्या महिन्यात किरकोळ बाजारात प्रति अंड 6 रूपये असणारा दर आता 7 रूपयांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या अंडी 80 रूपये डझनने विकली जात आहेत.

लॉकडाऊनमुळे अनेकांना 'वर्क फ्रॉम होम' काम करावे लागते. ही बैठी जीवनशैली आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. आरोग्‍यदायी जीवनासाठी उत्तमरित्‍या नियोजित व केंद्रित आणि संतुलित पौष्टिक आहार ही काळाची गरज आहे. शारीरिक व मानसिक आरोग्‍य व्‍यक्‍ती सेवन करत असलेल्‍या अन्‍नावर अवलंबून असते. प्रथिने शरीरातील पेशी, स्‍नायू, त्‍वचा, उती व अवयवांच्‍या चांगल्‍या आरोग्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त आहेत. चिकन व अंडी सारखे प्रथिनेयुक्‍त अन्‍नपदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्‍यामध्‍ये कॅलरींचे कमी प्रमाण असण्‍यासोबत प्रथिने संपन्‍न प्रमाणात असतात असे पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अजित रानडे यांनी सांगितले.

राज्यात साधारणता सव्वा कोटी अंड्याचे उत्पादन होते. मात्र अंड्यांची मागणी वाढल्याने शेजारील गुजरात,मध्यप्रदेश, तेलंगणा या राज्यांतून साधारणता 1 कोटी अंडी दररोज मागवली जात आहेत. कोरोना आणि बर्ड फ्ल्यूच्या अफवांचा पोल्ट्री व्यवसायाला फटका बसला. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी कुक्कुट उत्पादन तुलनेने कमी घेतले. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन ही कमी झाले असून मागणी मात्र वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT