Egg
Egg  File photo
मुंबई

मुंबईत प्रतिडझन अंड्यांचा दर ८० रुपये

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोना संसर्ग वाढल्याने अंड्यांची मागणी वाढली आहे. परिणामी अंड्यांचा दर डझनामागे 10 ते 12 रुपयांनी वाढला असून घाऊक बाजारात 4 रुपये 65 पैश्यांना मिळणारे अंडे किरकोळ बाजारात 7 रुपयांपर्यंत महागले आहे. मुंबईला दिवसाला 1 कोटी 80 हजारांच्या वर अंड्यांचा पुरवठा होत होता. त्यात आता वाढ होऊन 2 कोटी 25 लाखांवर पोहोचला आहे. साधारणता मार्च ते मे च्या दरम्यान अंड्यांची मागणी ही कमी होते. त्यामुळे अंड्यांचा दर प्रति अंड 5 रूपयांपर्यंत खाली घसरतो. यावर्षी मात्र नेमके उलटे झाले असून भर उन्हाळ्यात अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. कोरोना संसर्ग वाढल्याने पौष्टिक आहार घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पौष्टिक आहार म्हणून अंड्याकडे बघितले जात असून अंड्यांची मागणी वाढली असल्याचे पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अजित रानडे यांनी सांगितले.

अंड्यांची मागणी वाढल्याने त्याचा परिणाम अंड्यांचा पुरवठा आणि किमतींवर झाला आहे. वाढत्या मागणीमुळे परराज्यातून अंडी मागवण्यात येत असून त्यामुळे आता पुन्हा एकदा अंड्यांचा पुरवठा वाढला आहे. यासह अंड्यांचा दर ही वाढला असून गेल्या महिन्यात किरकोळ बाजारात प्रति अंड 6 रूपये असणारा दर आता 7 रूपयांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या अंडी 80 रूपये डझनने विकली जात आहेत.

लॉकडाऊनमुळे अनेकांना 'वर्क फ्रॉम होम' काम करावे लागते. ही बैठी जीवनशैली आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. आरोग्‍यदायी जीवनासाठी उत्तमरित्‍या नियोजित व केंद्रित आणि संतुलित पौष्टिक आहार ही काळाची गरज आहे. शारीरिक व मानसिक आरोग्‍य व्‍यक्‍ती सेवन करत असलेल्‍या अन्‍नावर अवलंबून असते. प्रथिने शरीरातील पेशी, स्‍नायू, त्‍वचा, उती व अवयवांच्‍या चांगल्‍या आरोग्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त आहेत. चिकन व अंडी सारखे प्रथिनेयुक्‍त अन्‍नपदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्‍यामध्‍ये कॅलरींचे कमी प्रमाण असण्‍यासोबत प्रथिने संपन्‍न प्रमाणात असतात असे पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अजित रानडे यांनी सांगितले.

राज्यात साधारणता सव्वा कोटी अंड्याचे उत्पादन होते. मात्र अंड्यांची मागणी वाढल्याने शेजारील गुजरात,मध्यप्रदेश, तेलंगणा या राज्यांतून साधारणता 1 कोटी अंडी दररोज मागवली जात आहेत. कोरोना आणि बर्ड फ्ल्यूच्या अफवांचा पोल्ट्री व्यवसायाला फटका बसला. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी कुक्कुट उत्पादन तुलनेने कमी घेतले. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन ही कमी झाले असून मागणी मात्र वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT