मुंबई

मान्सूनविषयीच्या 'या' १० भन्नाट गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? नक्की वाचा...

अथर्व महांकाळ

मुंबई: भारतात मान्सून येणार अशी बातमी कानावर पडली की देशातला प्रत्येक व्यक्ती सुखावतो. त्याच कारणही तसंच आहे. उन्हाळ्याच्या प्रचंड उकाड्यातून सुटका होण्यासाठी मान्सून देवानं पाठवलेल्या देवदूताचं काम करतो. मात्र हा मान्सून नेमका येतो कुठून? मान्सून आल्यावर काय बदल घडतात? मान्सून म्हणजे नेमकं काय? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

या आहेत मान्सूनबद्दल काही महत्वाच्या गोष्टी: 

(१) मान्सून म्हणजे काय?

'मान्सून' या शब्दाचा अर्थ पाऊस असा होत नाही. खरंतर मान्सून हा शब्द अरबी भाषेतल्या 'मौसीम' या शब्दापासून तयार झाला आहे. अरबी भाषेत मौसीम म्हणजे हवेत होणारे बदल. तसंच मान्सून म्हणजे थंड प्रदेशातून उष्ण प्रदेशाकडे प्रचंड वेगानं वाहणारे वारे. 

(२)  कसा तयार होतो मान्सून?

उन्हाळ्यात मध्य आणि उत्तर भारतात अति उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे हिंदी महासागरावर निर्माण झालेले वारे या उष्ण  प्रदेशांकडे वाहू लागतात. मात्र हे वारे प्रवासादरम्यान ढग ओढून आणतात. हे ढग हिंदी महासागरातून बाष्पीभवन होत असलेलं पाणी शोषून घेतात. जेव्हा हे ढग भारताच्या दक्षिण भागात येतात तेव्हा पर्वतरांगांना येऊन धडकतात. त्यामुळे पावसाला सुरुवात होते. यालाच आपण मान्सून म्हणतो. 

(३) वीज पडल्यामुळे किती मृत्यू ?

भारतात मान्सूनदरम्यान तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त वेळा वीज कडाडते. यामुळे प्रत्येक वर्षी तब्बल १७५५ पेक्षा जास्त लोकं मृत्युमुखी पडतात. 

(४) हवामानाचा अंदाज:

भारतात पहिल्यांदा पावसासंबंधीचा हवामान अंदाज ४ जून १८८६ ला तयार करण्यात आला होता. १८७१ पासून २०१९ पर्यंत तब्बल ९९ वर्ष भारतात सरासरी एवढा पाऊस आला आहे. तर २६ वर्ष दुष्काळाची आहेत.  

(५) मान्सून शब्दाचा वापर:

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणारे हंगामी वारे म्हणजे मान्सून. अखंड भारतात 'मान्सून' हा शब्द पहिल्यांदा ब्रिटिशांच्या काळात इंग्रजीमधून वापरण्यात आला होता.  

(६) खरा अर्थमंत्री: 

मान्सूनवर भारतातल्या तब्बल ७० कोटी  शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून आहे. भारताचा जीडीपी उंचावण्यात या शेतकऱ्यांचा तब्बल १६ - १७ टक्के वाटा असतो. त्यामुळे मान्सूनला काही अर्थतज्ञ 'खरा अर्थमंत्री' असंही संबोधतात. 

(७) भारतात मान्सूनचे दोन भाग:

भारतात मान्सून दोन भागांमधून येतो. एक म्हणजे बंगालच्या उपसागरातून तर एक अरबी समुद्रातून. हे दोन्ही मान्सून वारे संपूर्ण भारतात पसरतात. त्यानंतर राजस्थानच्या अतिउष्ण वातावरणामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि तिथूनही वारे वाहू लागतात. 

(८) सट्टाबाजारही जोमात:

मान्सूनचा अंदाज लावण्यात सट्टाबाजारही जोमात असतो. दरवर्षी भारतात मान्सूनचा अंदाज मांडण्यासाठी तब्बल २५ हजार कोटींचा सट्टा लागतो. 

(९) बेडकाच्या पाठीवर उंदीर:

मान्सून काळात आपल्याला बहुतांश वेळी पाण्यात असणाऱ्या बेडकाच्या पाठीवर उंदीर दिसून येतात. पावसाच्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून उंदीर बेडकांच्या पाठीवर बसतात. 

(१०) नाटकीय बदल: 

भारतातील मान्सूनमध्ये दरवर्षी नाटकीय पद्धतीनं बदल होत असतात. यात अतिसूक्ष्म बदल सुद्धा पूर किंवा ढगफुटीसारखं  भयावह रूप धारण करू शकतात.

10 facts about monsoon that u really do not know

 
    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : पेट्रोल- डिझेलचे दर आज पुन्हा बदलले, तुमच्या शहरात काय आहे ताजा दर? जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई-पुणे फक्त दीड तासात, तर मुंबई-पुणे-बंगळुरू साडे पाच तासात; गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

IND vs SA 3rd T20I : गिल, सूर्यकुमारच्या फॉर्मकडे लक्ष; भारत-आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

Kolhapur IT Park : अखेर कोल्हापूरला ‘आयटी पार्क’चा मार्ग मोकळा! जागा हस्तांतर निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब

Job Promotion Astrology: आठ दिवसांनी शुक्र आपली राशी बदलेल, 'या' राशींच्या लोकांना नोकरीत मिळेल पदोन्नती

SCROLL FOR NEXT