मुंबई

सरकारकडे अनलॉकचा एक्झिट प्लान आहे का? - मनसे

मंत्रिमंडळात बेरोजगारी, बँकांचे हप्ते यावर चर्चा होते का?

दीनानाथ परब

मुंबई: राज्य सरकारने लॉकडाउन संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सलग दुसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. यापूर्वी १५ एप्रिल ते ३० एप्रिल त्यानंतर एक मे ते १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला. आता लॉकडाउनचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील कोरोना स्थिती हळूहळू नियंत्रणात येतेय. मुंबईत स्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आलीय. रुग्ण दुपटीचा कालावधीही १५० दिवसांपेक्षा जास्त आहे.

ठाकरे सरकारच्या या लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मनसेचे नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन लॉकडाउन वाढवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सरकारकडे अनलॉकचा एक्झिट प्लान आहे का? नेमकी किती रुग्ण संख्या झाली की सरकार निर्बंध शिथिल करणार आहे? मंत्रिमंडळात लॉकडाउनवर चर्चा होते, तशी बेरोजगारी, बुडालेले उद्योगधंदे, वीजबिल,जनतेचे आर्थिक नुकसान, बँकांचे हप्ते यावर चर्चा होत असेल का? यावर ठोस उत्तर सरकार देईल का? असा सवाल मनसेने विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT