मुंबई

कल्याण डोंबिवलीतल्या तळीरामांना वाहतूक पोलिसांचा दणका

रविंद्र खरात

मुंबई: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालविणारे आणि त्यांचे सहप्रवासी यांच्यावर कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच दणका दिला. ख्रिसमस 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात वाहन चालक आणि त्यांचे सहप्रवासी यांच्यावर दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई केली.

गुरुवारी कल्याण पश्चिममध्ये वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या पथकाने 23 वाहन चालक आणि 8 सहप्रवासी यांच्यावर कारवाई केली. कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांच्या पथकाने 15 वाहन चालक आणि 8 सहप्रवासी यांच्यावर कारवाई केली. तर डोंबिवली वाहतूक शाखेने 36 वाहन चालक आणि 14 सहप्रवासी यांच्यावर कारवाई करत तळीरामांना दणका दिला. 

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

दारु पिऊन वाहन चालविण्याबाबत तुमच्याकडे किती ही आयडिया असल्या तरी सुद्धा  कारवाई पासून सुटका नाही. मद्य पिऊन वाहन चालविणे दंडनीय गुन्हा असून तुमच्या आणि दुसऱ्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. वाहतूक पोलिसांकडून असं आवाहन करणारा जनजागृती आणि संदेश देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या काळात कल्याण पश्चिमेला वाहतूक पोलिसांनी दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या 18 वाहक आणि त्याच्या सोबत असलेल्या 5 सहकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. कल्याण पूर्व कोळशेवाडी वाहतूक पोलिसांनी 12 वाहन चालक आणि 2 सहकारी तर डोंबिवलीमध्ये 27 वाहन चालक आणि त्यांचे 2 सहकारी यांच्यावर कारवाई केली आहे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Kalyan Dombivali Traffic police took action 31st night new year eve

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT