मुंबई

...अखेर डॉक्टरांना ते दोन्ही शवं पुन्हा नेऊन दुसऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधी उरकून घ्यावा लागला

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : कोरोनाबधित रुग्णांपाठोपाठ आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शवांचे अंत्यविधी करण्यासही विरोध होऊ लागला आहे. नेरुळ येथील स्मशानभूमीत तुर्भे भागातील कोरोनाबधितांचे दोन शवांचे अंत्यविधी करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला. त्यामुळे अखेर महापालिकेच्या डॉक्टरांना ते दोन्ही शव पुन्हा माघारी नेऊन दुसऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधी उरकून घ्यावा लागला. 

आज संध्याकाळी तुर्भे परिसरातील दोन कोरोनाबधितांच्या मृत्यू झाल्यामुळे त्यांचे शवं नेरुळ सेक्टर 4 येथे महापालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र शवं स्मशानात नेण्यात आल्यावर सारसोळे गावातील स्थानिक नागरिक मनोज मेहेर यांनी जोरदार विरोध केला.

महापालिकेने आणलेले शवं ज्या तुर्भे भागातील आहेत, त्याच भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तुर्भे स्मशानभूमीत व्यवस्था असताना नेरुळ स्मशानभूमीत हे शवं का आणतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे बाहेरच्या परिसरातील कोरोनाबाधितांचा अंत्यसंस्कार करू देणार नाही अशी भूमिका मेहेर यांनी घेतली. त्यामुळे अखेर पालिकेच्या पथकाला आणलेले शवं पुन्हा रुग्णवाहिकेतून माघारी घेऊन जावे लागले. आम्हाला जे आमचे वरिष्ठ सांगतात त्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो असे या प्रसंगी शव घेऊन आलेल्या डॉक्टरांनी उपस्थितांना सांगितले. 

महापालिकेने संपूर्ण शहरात नोंदनिहाय आद्ययावत स्मशानभूमी तयार केल्या आहेत. या सर्व ठिकाणी कोरोनाबधित शवांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ज्या भागातील व्यक्तीचे शव असेल त्या भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. - अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका. 

local people refuse to carry last rituals in nerul because demised were from turbhe area

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT