file photo 
मुंबई

ठाण्यातील आदिवासीला `छप्पर फाड के` लॉटरी!

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : `देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के...` असं म्हटलं जातं. ठाण्यातील एका आदिवासीला मात्र या `छप्पर फाड के`चा प्रत्यक्ष अनुभव आलाय. त्याला लॉटरी लागली, तीही थोडी थोडकी नव्हे... तब्बल 29 कोटी रुपयांची. रस्तारुंदीकरणात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात त्याला पालिकेकडून ही रक्कम मिळणार आहे.

सरकारी काम अथवा प्रकल्पासाठी एखादी जमीन ताब्यात घेतल्यानंतर नुकसानभरपाई मिळण्यासाठी पिढ्यानपिढ्या जाव्या लागतात. त्यातही महापालिकेकडून जमिनीच्या मोबदल्यात भरपाई आणि तीही रोख स्वरूपात मिळविण्यासाठी तर साता जन्माचे संचित जमा असावे लागते. पण या साऱ्या अंदाजांना फोल ठरवत ठाणे पालिका प्रशासनाने शहरातील आदिवासीला त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात तब्बल २९ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरपाई मिळणार असल्याने या आदिवासीला लॉटरीच लागल्याची चर्चा आहे.

हेही वाचा ः आधी हिरवा पाऊस, आता गुलाबी रस्ते ; नागरिक भयभीत..
 
ठाणे शहराच्या मंजूर विकास योजनेत घोडबंदर रोड येथील रस्ताची रुंदी ६० मीटर करण्यासाठी भाईंदरपाडा येथील जुना सर्व्हे क्र. २८६ आणि नवीन सर्व्हे क्र. १७ पै. या जमिनीसह ऑक्‍ट्रॉय नाका येथील जमीन बाधित होत आहे. २००० साली येथील जमीन मालकांना पालिकेकडून जमीन ताब्यात घेण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यावेळी भूखंडधारकांपैकी कुलमुख्यत्यार पत्रधारक चंद्रकांत ठाकूर यांनी त्यांना बाधित मिळकतीचा मोबदला मिळाला नसल्याने २२ जानेवारी २०१४ ला मोबदला हा रोख स्वरुपात अथवा टीडीआर स्वरुपात देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. ही मागणी मान्य न झाल्याने पालिकेच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. 

उच्च न्यायालयाने १० मार्च २०१७ ला दिलेल्या निर्णयानुसार नवीन भूसंपादन कायदा २०१३ मधील तरतूदीनुसार भूखंडधारकांच्या संमतीत वाटाघाटीने या विषयावर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एकूण आठ हजार ६३७ चौरस मीटर जागा बाधित होत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र ही जमीन आदिवासींची असल्याने शिवाय तिचे हस्तांतरण शक्‍य नसल्याने भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. तसेच या जागेच्या बदल्यात तब्बल २९ कोटी ४५ लाख रुपये देण्याची तयारी महापालिकेकडून कळविले जाणार आहे. या आशयाचा ठराव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. 

हेही वाचा ः #HopeofLife : मुंबई महापालिकेचे पहिले कर्करोग रुग्णालय २०२१ मध्ये

एकीकडे शहराला रुंद रस्ते उपलब्ध होण्यासाठी आपली घरे सोडून अनेक रहिवाशांना रेंटलमधील घरांमध्ये राहण्याची वेळ आली आहे. त्यांना या रेंटलच्या घरांमध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पण त्यांच्यासाठी अद्याप कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आलेली नाही. पण नुकसान भरपाईबाबत घोडबंदर रोड येथील आदिवासी कुटुंब मात्र नशीबवान ठरलेले आहेत. 

रस्ता बाधित होत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पालिकेकडून नुकसान भरपाई दिली जात असल्याने भविष्यात अजून काही आदिवासी तसेच घोडबंदर रोड येथील शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांची ‘विशेष’ धावपळ
ठाणे पालिकेच्या इतिहासात आतापर्यंत कोणालाही अशाप्रकारे एकाच वेळी २९ कोटींची नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. पण आदिवासी बांधवांच्या पाठिशी पालिकेतील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ आशीर्वाद लाभल्यानेच या आदिवासी बांधवांना वेळेत रोख रक्कमेत कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे कळते. यासाठी पालिकेतील शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने तसेच घोडबंदर रोड येथील भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने ‘विशेष’ धावपळ केल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT