MLA Ashish Shelar sakal media
मुंबई

विरोधी पक्ष आणि जनतेच्या रेट्यामुळे निर्बंध उठवले - आशिष शेलार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नववर्षानिमित्ताने गुढीपाडव्याला (Gudi Padwa) निघणाऱ्या स्वागतयात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुका होऊ नयेत अशी सरकारची इच्छा होती; पण जनतेचा व विरोधी पक्षाचा रेटा वाढल्याने अखेर निर्बंध उठवण्याचा (covid curbs) निर्णय सरकारला (Maharashtra government) घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली. विधानसभा सुरू असताना मी स्वत: त्याबाबत सभागृहात मागणी केली. त्या वेळी मात्र काही जाहीर करण्यात आले नाही. त्यानंतर जनतेचा रेटा वाढू लागला तेव्हा रोष अंगावर येऊ नये म्हणून ठाकरे सरकारने आज हा निर्णय घेतला.

यासाठी एवढा उशीर का झाला? यापूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय का घेतला नाही? गुढीपाडवा दोन दिवसांवर आला असताना निर्णय का घेतला? याची परवानगी दिल्लीतून कुठल्या पक्ष कार्यालयातून येणार होती का? असे प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केले आहेत. हिंदू नववर्ष स्वागतयात्रा होऊ नये असेच प्रयत्न केले जात होते. मुंबईवर दहशतवादी हल्ले ड्रोनच्या माध्यमातून होणार, अशी भीती घालून जमावबंदी लावण्यात आली होती.

सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास कोणताही विरोध असण्याचे कारण नाही; पण हिंदू सणांवर निर्बंध घालण्याचे षड्‍यंत्र होते. आम्ही ते उघड केले. त्यामुळे जनतेचा रेटा वाढला म्हणून निर्बंध उठवावे लागले, असेही शेलार यांनी म्हटले आहे. मास्कबंदी उठवली तर तो निर्णय वैद्यकीय अभ्यास गटाच्या सूचनेनुसार होणे अपेक्षित आहे. मास्कबंदीच्या नावाने नाक्यानाक्यावर जी बेहिशेबी वसुली सुरू होती त्याचे काय, असा सवालही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT