sc 
मुंबई

अर्णब गोस्वामी यांना आवरा म्हणत राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

सकाळवृत्तसेवा

मुंबई : पालघर हिंसाचाराबाबत दिशाभूल करणारे आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे वृत्त प्रसिद्ध केल्याचा आरोप असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात राज्य सरकारने मंगळवारी (ता. 5) सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. गोस्वामी यांना पोलिसांवर बेछूट आरोप करण्यापासून रोखा, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक झाल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परंतु, गोस्वामी त्यांच्या रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीवरून पोलिसांवर विनाकारण आरोप करत आहेत. पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना रोखा, अशी मागणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. गोस्वामी यांनी काही ट्विट करून पोलिसांवर टीका केली होती. पोलिस आपल्या तक्रारीची दखल घेत नसल्याचा दावा त्यांनी वारंवार केला आहे. पत्रकार म्हणून गोस्वामी यांचे स्वातंत्र्य मान्य आहे; मात्र त्यांच्या विधानांमुळे पोलिसांचे खच्चीकरण होत आहे, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

आणखी एक गुन्हा
अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आणखी एक फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रझा एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटीने ही तक्रार केली आहे. वांद्रे येथे झालेली गर्दी म्हणजे देशविरोधी कारस्थानाचा भाग आहे. तेथे जमा झालेल्या मजुरांना जाणीवपूर्वक आणण्यात आले होते, असे त्यांच्या वृत्तवाहिनीवरून सांगण्यात आले होते. संबंधित तक्रार रद्द करण्यासाठी गोस्वामी यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे.

maharashtra government's goes in supreme Court agains Arnab Goswami

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT