rajesh.jpg
rajesh.jpg 
मुंबई

राजेशे टोपेंनी सांगितला कोरोनाला रोखण्याचा रामबाण उपाय

दीनानाथ परब

मुंबई: "केंद्राच्या सूचना आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचं  काटेकोरपणे महाराष्ट्रात पालन होतं. ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट हे सूत्र महाराष्ट्रात पाळलं जातं" असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. "गर्दी टाळण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करतोय. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी आव्हानात्मक गोष्ट सांगितली. तीन लाख लसीकरण करत होतो, त्यांनी सहा लाख करायला सांगितलं. केंद्राकडून पुरवठा केला जाईल असं सांगितलं होतं. आम्ही साडेचार-पाच लाखापर्यंत पोहोचू आणि लवकरच सहा लाखापर्यंत जाऊ" असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. 

"लस नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद ठेवावं लागतं. लस नाही म्हणून परत पाठवाव लागतय. आमच्या गतीने लस पुरवठा झाला पाहिजे" असे राजेश टोपे म्हणाले. "कोरोनाला रोखायचं असेल, तर रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे अँटीबॉडी वाढवणं हा रामबाण उपाय आहे" असं टोपे म्हणाले. "४५ वर्षाच्या लोकांना लसीकरण करण्यासाठी गाव पातळीवर टीम तयार केली आहे. 20 ते 40 वर्षाच्या वयोगटातील कोरोना रुग्ण वाढत आहेत. इतर राज्यात उशिरा करा पण महाराष्ट्रात पहिल 20 वर्षावरील नागरिकांना लस द्या, ही मागणी आम्ही केली आहे" असे टोपे म्हणाले. 

"ऑक्सिजन पुरवठ्यावर आम्ही FDA च्या माध्यमाने नियंत्रण ठेवत आहोत. ऑक्सिजन इतर राज्यातून आम्हाला द्यावेत ही मागणी केंद्राला केली आहे. A B C कॅटेगरितील रुग्णावर  रेमडीसीवरचा वापर करू नका. हॉस्पिटलचे बिल वाढण्यासाठी रेमडिसीवरचा वापर करू नये" असे टोपे यांनी सांगितले. 

"मुंबई, पुणे येथे अडचण असली तरी बेड उपलब्ध आहेत. पुण्यात बेड वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुकाने बंद केल्याचा रोष आहे. पण आपल्याला जीव वाचवायचे आहेत. थोडी कळ सोसली तर रुग्ण कमी होतील. आज 14 लाख लस म्हणजे 3 दिवसांचा साठा बाकी आहे. दर आठवड्याला 40 लाख लस पुरवठा केंद्राने करायला हवा. 2 दिवसांत 6 लाख प्रतिदिन लसीकरण होईल" असे राजेश टोपे म्हणाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT