pollution 
मुंबई

सुटीमुळे नागरिकांची  प्रदूषणातून सुटका 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाशिवरात्रीच्या सार्वजनिक सुटीमुळे शुक्रवारी (ता. 21) मुंबईसह नवी मुंबईतील नागरिकांची वायुप्रदूषणातून सुटका झाली. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात या महिन्यातील आणि नवी मुंबईत चार दिवसांतील सर्वांत कमी प्रदूषणाची नोंद झाली. 

मुंबईत प्रामुख्याने बांधकामांमुळे उडणारी धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे वायुप्रदूषण होते. शुक्रवारी महाशिवरात्रीची सार्वजनिक सुटी असल्याने रस्त्यांवर वाहनांची संख्या कमी होती व अनेक ठिकाणी बांधकामे बंद होती. परिणामी प्रदूषणाच्या पातळीत घट झाल्याचे सांगण्यात आले. 

मुंबईत या महिन्यातील सर्वांत कमी प्रदूषणाची नोंद 10 फेब्रुवारीला झाली होती. प्रत्येक घनमीटर हवेत तरंगत्या धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण 10 फेब्रुवारीला 137 मायक्रोग्रॅम, तर 21 फेब्रुवारीला 132 मायक्रोग्रॅम होते. 
शहरातील सर्वांत प्रदूषित ठिकाण असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातही हवेचा दर्जा चांगला होता. बीकेसी येथे पीएम 2.5 चे प्रमाण 10 फेब्रुवारीला 166 मायक्रोग्रॅम, 21 फेब्रुवारीला 145 मायक्रोग्रॅम होते. 
नवी मुंबईत गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी हवेच्या दर्जात सुधारणा झाली. हवेतील तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण गुरुवारी 404 मायक्रोग्रॅम आणि शुक्रवारी 347 मायक्रोग्रॅम नोंदवण्यात आले. भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या "सफर' उपक्रमांतर्गत प्रदूषणाची पातळी नोंदवली जाते. 


प्रदूषकांच्या पातळीवरून हवेचा दर्जा 

  •  0 ते 50 मायक्रोग्रॅम : उत्तम 
  •  50 ते 100 मायक्रोग्रॅम : चांगला 
  • 100 ते 200 मायक्रोग्रॅम : ठीक 
  • 200 ते 300 मायक्रोग्रॅम : खराब 
  • 300 ते 400 मायक्रोग्रॅम : अतिप्रदूषित 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Shivaji Patil : आमदार शिवाजी पाटील गोकुळच्या पहिल्याच कुस्तीत चितपट, मंत्री हसन मुश्रीफांचा पहिला डाव यशस्वी

Mumbai: मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणांत महाराष्ट्र पहिला, बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही वाढ; क्रायची नोंद

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

SCROLL FOR NEXT