अलिबाग : मतलई वाऱ्याने थंडीचा जोर वाढत असून आंबा पिकासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. मात्र, लांबलेल्या पावसाने अद्यापही 90 टक्क्याहून अधिक झाडांवर कोवळी पालवी आहे. ही पालवी जुन होऊन मोहोरधारणा सुरु होण्यास जानेवारी महिना उजाडणार आहे. या दरम्यानचे वातावरणात बदल झाल्यास त्याचा परिणाम आंबा पिकावर होण्याची शक्यता असल्याने यावर्षीचा आंबा पिक कसा असेल याबद्दल येथील आंबा बागायतदार शाशंक आहेत.
आठवडाभरापूर्वी ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे आंबा बागायतदार चिंचेत होते. सर्वसाधारणपणे आंब्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोहोर आलेला असतो. रायगड जिल्ह्यात केवळ 10 ते 15 टक्केच बागांमध्ये मोहोर धारणा झालेली आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणानंतर मतलई वारे जोर धरत आहेत. यामध्ये चांगली थंडी जाणवू लागली आहे, ही परिस्थिती आंबा पिकासाठी योग्य आहे. बहुतांश झाडांना नुकतीच कोवळी पालवी आल्याने बागा हिरव्यागार दिसत आहेत.
या झाडांना मोहोर येण्यास जानेवारी महिना उजाडणार असल्याने प्रत्यक्ष आंब्याचा हंगाम मे महिन्यापर्यंत जाणार असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यापेक्षा हंगाम लांबल्यास जून महिन्यात पडणाऱ्या पावसाने आंब्याला योग्य दर मिळणार नाही. लांबलेला पाऊस आणि नुकत्याच आलेल्या ढगाळ वातावरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतीवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसत आहे. येणाऱ्या संकटावर मात करत आहेत. परंतु यावर्षीचा हंगाम कसा असेल, याबद्दल येथील आंबा बागायतदार चिंता व्यक्त करीत आहेत.
बहुतांश झाडांवर कोवळी पालवी आहे, ही पालवी जुन होऊन मोहोर येण्यास साधारण जानेवारी महिना उजाडण्याची शक्यता आहे. यावर्षी हंगाम कसा असेल हे बदलत्या वातावरणामुळे आताच सांगणे कठिण आहे.
-भाऊ डिके
प्रगतशील आंबा बागायतदार- रोहा
--------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.