मुंबई

Coronavirus | होम क्वारंटाईनचे नियम मोडणारे कोरोना संसर्ग वाढवण्यास जबाबदार

मिलिंद तांबे

मुंबई  : अनेक रुग्णांकडून होम क्वारंटाईनचे उल्लंघन होत आहे. होम क्वारंटाईनचे नियम मोडणारे कोरोना संसर्ग वाढवण्यास जबाबदार असल्याचे मत राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी म्हटले आहे. जर लोकांनी कोरोना नियम पाळले नाही तर लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला.

कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर अनेक कोविड रुग्णांकडून होम क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याशिवाय सोशल डिस्टसिंग न पाळणे आणि कॉटक्ट ट्रेसिंगसाठी पुरेशे संसाधन नसणे या कारणामुळे दुसऱ्या टप्प्यात कोरोना फैलावला असल्याचे ही डॉ साळुंखे यांनी सांगितले.

राज्यात फेब्रुवारी पासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागल्याचे दिसते. 2 हजारापर्यंत खाली आलेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा 8 हजाराच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 21,38154 च्या वर गेली आहे. दैनंदिन रुग्णांसह मृतांचा आकडा ही वाढू लागला आहे. कोरोना बाबत शासनाने घालून दिलेली त्रिसूत्रीचे पालन अधिकतर लोकं करत नाही. शिवाय रुग्णालयातून घरी आल्यावर बहुतांश लोकं होम क्वारंटाईनचे नियमावली पाळत नाही, त्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल ठरत असल्याचे राज्याचे कोरोनासंबधीचे तांत्रिक सल्लागार डॉ सुभाष सांळुखे यांनी म्हटले आहे.

लोकं बेजबाबदारपणे फिरतांना दिसत आहेत. मास्क शिवाय लोकं फिरत आहेत. सोशियल डिस्टन्सींग कुणीही पाळत नाही. यामुळे रुग्णासंख्येत वाढ होत असून ही वाढ अशीच सुरू राहिली तर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला. कोविड नियमांचे कठोर पालन करण्यासंदर्भात शासन स्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. कोविड चाचणी करण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लोक सहकार्य करत नसून,अनेक जण चाचणी करण्यास नकार देत आहे, त्यामुळे या पथकांना नाईलाजाने पोलिसांना सोबत घेऊन जात लागत असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग आपल्या पीक वर असतांना संस्थात्मक क्वारंटाईन मधील व्यक्तींची संख्या ही काही लाखांवर होती. असे असून ही त्यावेळी प्रशासनाने ती परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली. यावेळी संस्थात्मक क्वारंटाईन मधील व्यक्तींची संख्या 50 हजाराच्या आत आहे. असे असले तरी लोकांचे योग्य सहकार्य मिळणे आवश्यक आहे. लोकांनी चांगले सहकार्य केले तर या वेळीही कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात यश मिळेल असे आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ अर्चना  पाटील यांनी सांगितले.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi news Coronavirus Breaking the rules home quarantine increasing corona infection mumbai live update

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT