मुंबई

गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी सेवा सुरु होणार? कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश...

संजय घारपुरे

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी महामंडळाची सेवा बंद ठेवण्यात आली होता. दोन ते अडीत महिने सेवा बंद असताना केवळ महामुंबईत अत्यावश्यक सेवांसाठी एसटी सेवा सुरु होती. मात्र, अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा मर्यादित स्वरुपात सुरु करण्यात आली होती. त्यासाठी निवडक कर्मचाऱ्यांनाच कर्तव्यावर बोलावले जात होते.

आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सोमवारपासून कामावर हजर राहण्याचा आदेश दिला आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना घेऊन जाण्यासाठी आता बसच्या सर्व सेवा चालवणे भाग पडणार आहे, त्यासाठीच हा निर्णय झाल्याचे समजते. परळ डेपोत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याबाबत निरोप पाठवल्याचे वृत्त आहे. राज्य सरकारने राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बस रस्त्यावर येणार असल्याची अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. तसेच याला अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजूरीही मिळालेली नाही. मात्र राज्य परिवहन मंडळाने याबाबतची पूर्वतयारी सुरु केली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई, ठाणे तसेच पालघर विभागातील अनुपस्थितीचे प्रमाण वाढत आहे. ते आता 70 टक्क्यापर्यंत गेले आहे. त्यामुळे परिवहन मंडळास अतिरीक्त बस चालवणे प्रत्येक दिवसागणिक जास्त अवघड होत आहे. राज्य परिवहन मंडळाने अद्याप जूनचा पगारही कर्मचाऱ्यांना दिला नसल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर काम नसल्यामुळे अनेक कर्मचारी गावाला गेले असल्याचे सांगितले जात आहे. महामंडळाने मे महिन्याचा केवळ पन्नास टक्के पगार दिला तर मार्चचा 75 टक्के दिला होता. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी अनेक कर्मचारी गावाला गेले आहेत, असे सांगण्यात येत आहे. 

मुंबईतली मृत्यूसंख्या चिंताजनक, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्य परिवहन मंडळाच्या आधिकाऱ्यांनी अनुपस्थितीचे प्रमाण वाढल्याचे वृत्त फेटाळले आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा प्रश्न गंभीर नाही. जास्त बस चालवण्याची गरज निर्माण झाल्यावर त्यानुसार कर्मचारीही कामावर रुजू होतील, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. त्यांनी त्याचवेळी वेतन देण्यासाठी राज्य सरकारला साह्य करण्याची विनंती केली आहे. कर्मचाऱ्यांचे थकित वेतन लवकरच देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्य परिवहन मंडळास कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन देण्यासाठी दरमहा तीनशे कोटींची आवश्यकता आहे.
----
संपादन ः ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : "हा तकलादू जीआर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही"- सुजात आंबेडकर

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT