बीडीडी पुनर्विकास प्रकल्प  sakal
मुंबई

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील अडथळा दूर

रहिवाशांसोबतचा करारनामा करण्यास होणार सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वरळी, ना.म. जोशी आणि नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. रहिवाशांच्या पुनर्वसन सदनिकेचे करारनामे, दस्तावर आकारायचे मुद्रांक शुल्क प्रति सदनिका नाममात्र एक हजार रुपये आकारण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर यावर शिक्कामोर्तब करणारे राजपत्र शनिवारी (ता. 9) प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे म्हाडाकडून लवकरच रहिवाशांसोबत करारनामा करण्यास सुरुवात होणार असून बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे.

बीडीडी चाळींच्या रहिवाशांना म्हाडा 500 चौरस फुटाची सदनिका मालकी तत्वावर विनामूल्य वितरीत करणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या संघटनांनी कायमचा करारनामा देण्याची मागणी लावून धरली होती. रहिवाशांची मुद्रांक शुकाची रक्कम म्हाडाला भरावी लागणार होती. त्यामुळे म्हाडाला प्रत्येक सदनिंकेपोटी दीड ते दोन लाखांचा भुर्दंड सहन करावा लागणार होता.

प्रकल्पाला होत आलेला विलंब आणि मुद्रांक शुल्काची रक्कम यामुळे हा प्रकल्प राबविणे म्हाडाला कठीण होणार होते. त्यामुळे म्हाडाने मुद्रांक शुल्क एक हजार रुपये करण्याचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महसूल व वन विभागाने महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमनुसार घेण्यात येणारे मुद्रांक शुल्क एक हजार निश्चित केले आहे. याबाबत राज्यपालांच्या आदेशानुसारचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे तिन्ही बीडीडी चाळीतील रहिवाशांसोबत करारनामा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT