मुंबई

अकरावी प्रवेशाची अखेरची यादी लागली; अजूनही ऍडमिशन झाली नसेल तर कशी घ्याल ऍडमिशन, जाणून घ्या

तेजस वाघमारे

मुंबई, ता. 30 : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे शुक्रवारी (29 जानेवारी) पुर्ण झाली. यानंतरही काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नसून प्रवेशासाठी विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. तर प्रवेशाच्या अखेरच्या फेरीनंतर सुमारे 82 हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. जागावाटप झालेल्या विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. 

शुक्रवारी (ता.29) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रवेशाच्या सातव्या फेरीचे प्रवेश पार पडले. यात दहावी पास विद्यार्थी तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. या विद्यार्थ्यांना शनिवार (ता.30) पर्यंत प्रवेश घ्यायचे आहेत. मुंबई विभागात या फेरीमधील 18 हजार 317 विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रवेश घेतले आहेत.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रवेशाच्या आतापर्यंत 7 फेऱ्या पार पडल्या असून या फेऱ्यानंतर अकरावीच्या 82 हजार 240 जागा रिक्त राहिल्या आहेत. सातव्या फेरीत 22 हजार 919 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट झाले होते. त्यापैकी 18 हजार 317 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर 459 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले.

प्रवेशच न मिळालेले तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीतील प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश कसे द्यायचे याचा निर्णय रिक्त जागा जाहीर झाल्यानंतर होण्याची शक्‍यता आहे. रिक्त जागांचा अहवाल 31 जानेवारीला अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

mumbai college admission news 82 thousand seats are still vacant in MMR region

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT