मुंबई

एकीकडे लॉकडाऊन नियम होतायत शिथिल, दुरीकडे मुंबईत रुग्णांचा आकडा 40 हजारांच्या वर...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 40 हजाराच्यावर पोहोचला असून १ जून रोजी मुंबईत 1413 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 40,877 झाली आहे. तर सोमवारी मुंबईत 40 जणांचा मृत्यू झाला असून  मृतांची एकूण संख्या 1319 झाली  आहे.

मुंबईत सोमवारी 40 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 1319 वर पोचला आहे. सोमवारी नोंद झालेल्या 40 मृत्यूंपैकी 26 जणांना दीर्घकालीन आजार होते. त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 21 पुरुष तर 19 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 20 रुग्ण 60 वर्षांवरील होते. 20 रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते.

संशयित रुग्णांमध्येही वाढ झाली असून आज एकूण 670 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 31,739 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढती असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढती आहे. आज 193 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत मुंबईतून 16,987 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

मुंबईत 2 लाखाहून अधिक चाचण्या 

मुंबईत गेल्या अडीच महिन्यात कोरोना चाचण्यांचे क्षमता वाढवण्यात आली असून 1 जून पर्यंत 2,01,507 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. प्रयोगशाळांंच्या संख्येत देखील वाढ करण्यात आल्याने चाचण्यांची क्षमता आणखी वाढली आहे. सोमवारी केवळ एका दिवसात 3 हजार 800 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

mumbai covid19 patient count crossed mark of forty thousand

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT