mumbai crime police marathi news Sakal
मुंबई

Mumbai Crime: बेकायदेशीर बांग्लादेशींना पोलिसांनी केली अटक !

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime : नवीन पनवेलमधील आदई गाव परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नुकतीच अटक केली. यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

ते सहा महिन्यांपासून आदई गावात वास्तव्यास असल्याचे त्यांच्या चौकशीत उघडकीस आले आहे. रूपा शागर सरकार (वय २७), सुमी कोबोर शेख (वय २३), रिदाई रफिक मंडोल (वय २१) व मिनल बरल (वय ४६) अशी त्यांची नावे आहेत.

ओमसाई बिल्डिंगमध्ये मयांक ठाकूर यांच्या घरात बेकायदा राहत होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांनी या बांगलादेशी नागरिकांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शरद भरगुडे व त्यांच्या पथकाने आदई गावातील ओम साई बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरील संशयीत घरावर छापा मारला.

तेथे हे सर्वजण राहत असल्याचे आढळले. त्यांनी काही महिन्यांपूर्वी विना पासपोर्ट वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याचे कबूल केले. खांदेश्वर पोलिस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम तसेच पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT