मुंबई

विमानसेवा बंद होण्यापूर्वी मुंबई-दिल्ली विमानाचं तिकीट कितीला विकलं गेलं माहितीये? वाचा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : भारतात कोरोनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. भारतात ६०० च्या वर कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार २४ तारखेच्या रात्री सर्व देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळे २४ मार्चला तिकिटांचे दर गगनाला भिडले होते.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व कंपन्यांनी २५ मार्चपासून विमानसेवा बंद केली. मात्र त्याआधी २४ मार्चला विमान कंपन्यानी आपले काही विमानं रद्द केले होती. प्रवासी संख्या जास्त असल्यामुळे तिकिटांचे दर गगनाला भिडले होते. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिक आपल्या आपल्या गावी परत जातायत.

रविवार आणि सोमवारी मुंबई ते दिल्ली १६०००, मुंबई ते कोची ११०००, मुंबई ते जयपूर ३१००० तर मुंबई ते हैदराबाद ८५०० असे तिकिटांचे दर होते. तर मंगळवारी हेच दर ३५०००-३६००० या घरात पोहोचले होते. मंगळवारी मुंबई ते दिल्ली विमान तब्बल ३२ हजारांना विकलं गेलंय. विशेष म्हणजे तिकिटांचे दर इतके जास्त असूनही लोकं काही नागरिकांनी विमानाने प्रवास केलाय.

भारतात आंतरराष्ट्रीय विमानांना या आधीच बंदी घालण्यात आली आहे . मात्र देशांतर्गत विमानसेवा पहिल्यांदाच बंद करण्यात आली आहे. सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर विमानानं आपल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी विमानतळावर झाली होती. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण मुंबईहून आपल्या मूळ गावी जात होते.

mumbai delhi flight ticket sold at thirty two thousand due to corona covid19 pandemic

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT