मुंबई

सरकार आणि वीज कंपन्यांमध्ये लेनदेन, वीजबिल माफीवरून शरद पवारांबाबत काय म्हणालेत राज ठाकरे

सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाशी कोर्टात टोलनाका तोडफोडप्रकरणी हजेरी लावली. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर राज ठाकरे यांना वाशी कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे ठाण्यात गेलेत. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कंबर कसली आहे. दरम्यान ठाण्यात राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना वीजबिल माफीवरून राज ठाकरे यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. वीज कंपन्या आणि सरकारमध्ये काहीतरी लेनदेन झाल्याशिवाय वीज कंपन्यांशी चर्चा थांबणार नाही असं राज ठाकरे म्हणालेत.   

पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना विचारण्यात आलं की, "सर्वसामान्य नागरिकांमध्ये वीजबिलासंदर्भात आक्रोश आहे. अशात वीजबिल माफीवर कोणतंही ठोस पाऊल राज्य सरकारकडून उचलण्यात येत नाही. वीजबिलमाफीवर टंगळमंगळ सुरु आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. एकीकडे BJP देखील रस्त्यावर आली आहे. आपण आपली पक्ष म्हणून काय भूमिका आहे." 

याबाबत उत्तर देताना राज ठाकरे म्हणालेत,  "वीजबिलमाफीबाबत पाहिलं आंदोलन आम्ही केलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. या सगळ्या आंदोलनामध्ये आमच्या पोरांवर केसेस आहेत. नागरिकांनी या सर्व गीष्टींचा विचार करायला हवा. नागरिकांसाठी त्यांच्या वीजबिलांसाठी रस्त्यावर कोण उतरलं याचा विचार करायला हवा. लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांना तोटा झाला म्हणून तुम्ही सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करतात, तर कसं होईल ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 

पुढे राज ठाकरे म्हणालेत, सुरवातीला सरकारमधील मंत्र्यांनी वीजदरात कपात करू म्हणून घोषित केलं. त्यानंतर एकदम घुमजाव केलं गेलं. मी राज्यपालांना याबाबत भेटायला गेलो तेंव्हा त्यांनी मला शरद पवार साहेबांशी बोलायला सांगितलं. मी शरद पवारांशी बोललो. मला शरद पवारांनी सांगितलं की वीज कंपन्यांशी पत्रव्यवहार करा आणि ती पत्र माझ्याकडे पाठवा. त्यानंतर मी अदानी, MSEB किंवा टाटा यांच्याशी बोलतो. पाच सहा दिवसांनी मला असं समजलं की अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेलेत. चर्चा काय झाली मला माहित नाही. मात्र त्यानंतर सरकारकडून असं सांगितलं गेलं की, वीजबिल माफ केलं जाणार नाही. ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सरकारमधील नेते तुमच्यासमोर येतात तेंव्हा तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारायला हवेत. आम्ही आंदोलन केल्यावर तुम्ही केसेस टाकतात. तुम्ही वीजबिले माफ करत नाहीत, लोकांना भरमसाठ बिले भरायला सांगतात, तर हे कुणासाठी सुरु आहे? असाही सवाल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

एकीकडे मुलांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि अशात सरकारचा जो निर्दयी पणा सुरु आहे,  तो मला समजत नाही. वीजबिल माफ होणार नाही हे अदानी किंवा वीज कंपन्यांशी चर्चा केल्याशिवाय होणार नाही. या कंपन्यांसोबत चर्चा म्हणजे काय ? काही लेनदेन झाल्याशिवाय या चर्चा थांबणार नाहीत. सरकार वीज कंपन्यांना पाठीशी घालतंय असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केलाय. 

mumbai news some deal done between power companies and government raj thackeray  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT