Chief Minister Eknath Shinde mumbai sakal
मुंबई

मुंबई : पोलिसांना १५ लाखांत स्वमालकीची घरे देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेंतर्गत ही घरं देण्यात येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतल्या वरळी, ना. म. जोशी आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्यात येत आहे. या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेंतर्गत पोलिसांना स्वमालकीची घर मिळणार आहेत. या घरांच्या किंमती परवडणाऱ्या नसल्यानं आता १५ लाखांमध्ये ही घर पोलिसांना देण्यात येतील अशी महत्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. (Mumbai Police will get self owned house in 15 lakhs CM Eknath Shinde announces in VidhanSabha)

मुख्यमंत्री म्हणाले, बीबीडी चाळीच्या पुनर्विकास योजनेतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न २०२१ पासून प्रलंबित होता. यातील बावीसशे घरं पोलिसांना मालकी तत्वावर देण्यात येणार आहेत. पण या घरांच्या किंमती पोलिसांना परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळं आधी ५० लाख रुपये किंमत असलेल्या या घरांची किंमत २५ लाखांवर आणण्यात आली. पण ही किंमतही अधिक असल्यानं आता ही घरं १५ लाखांमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

काय आहे बीडीडी चाळींचा प्रश्न?

दरम्यान, गेल्या महिन्यात लोअर परेल येथील ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला कंत्राटदाराने सुरुवात केली. मात्र रहिवाशांकडून सहकार्य मिळत नसल्याने कंत्राटदाराने काम सुरू करण्यासाठी आणलेली यंत्रसामुग्री हलवली होती. त्यामुळं रहिवाशांना प्रकल्प रखडण्याची भीती वाटू लागली असून म्हाडाने प्रकल्पाला गती देण्याची मागणी रहिवासी करत आहेत.

वरळी, ना. म. जोशी आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्यात येत आहे. वरळी, नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम रखडले होते. काही महिन्यांपूर्वी येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. त्यानुसार ललित कला भवनाच्या मैदानावर पत्रे मारण्यात आले तर ११ नंबरची इमारत पूर्णपणे तोडण्यात आली आहेत.

इथे ३२ इमारती असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १० इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम वेगाने होण्यासाठी सात इमारती रिकाम्या कराव्या लागणार आहेत. त्यापैकी २ इमारती ९० टक्के रिकाम्या झाल्या आहेत. रहिवासी इमारती रिकाम्या करत नसल्याने कंत्राटदाराने येथील कामासाठी आणलेली यंत्रसामुग्री परत नेली आहे. या गतीने प्रकल्पाचे काम सुरू राहिले, तर प्रकल्प कधी पूर्ण होईल, असा सवाल रहिवासी करत आहेत. यामध्ये म्हाडा अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी ना. म. जोशी मार्ग पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT