Ramdas Athawale  esakal
मुंबई

Ramdas Athawale : चवदार तळे सत्याग्रह हा विश्वाला समतेची प्रेरणा देणारा मानव मुक्तीचा संग्रम

चवदार तळे सत्याग्रहामुळे महाडची भूमी एक क्रांतिभूमी ठरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चवदार तळे सत्याग्रहामुळे महाडची भूमी एक क्रांतिभूमी ठरली आहे.

मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाड चवदार तळे येथे तत्कालीन अस्पृश्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी केलेला सत्याग्रह हा संपूर्ण विश्वाला समतेची प्रेरणा देणारा मानव मुक्तीचा संग्रम ठरला आहे.

चवदार तळे सत्याग्रहामुळे महाडची भूमी एक क्रांतिभूमी ठरली आहे. क्रांतिसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांची प्रेरणा देणा-या महाडच्या चवदार तळे क्रांतिभूमी चा आम्हाला अभिमान आहे, असे प्रितपादन रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. महाड चवदार तळे सत्याग्रहानिमीत्त शुभ संदेश पाठवून राज्यातील जनतेला ना. रामदास आठवलेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चवदार तळे सत्याग्रह केला त्याचबरोबर विषमतेचे प्रितक असलेल्या मनुस्मृतीचे दहनही महाड येथेच केले. त्यामुळे महाड ही क्रांतिभूमी देशभरातील आंबेडकरी जनतेला प्रेरणा देणारे क्रांतिभूमी आहे. असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.

रिपब्लीकन पक्षातर्फे महाड चवदार तळे येथे येणा-या आंबेडकरी अनुयायांसाठी पाण्याची, अल्पोहाराची व्यवस्था अनेक ठिकाणी करण्यात आल्याची माहिती ना. रामदास आठवलेंनी दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला चवदार तळे सत्याग्रह हा जगभरातील मानवतावादी चळवळीला समतेच्या चळवळीला प्रेरणा देणारा सत्याग्रह आहे असे ना. रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT