मुंबई

मुंबईकरांसाठी खुशखबर! मालमत्ता कराबाबत BMCने घेतला मोठा निर्णय; कोरोना संकटामुळे दिलासा

सुनिता महामुनकर


मुंबई : महापालिकेने यंदा मालमत्ता करवाढ न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या मुंबईकरांना असा निर्णय झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या मालमत्ता करात दर पाच वर्षांनी 40 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची कायद्यात तरतूद आहे. ही पाच वर्षांची मुदत या वर्षी संपत होती. मात्र, यंदा कर न वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे समजते. 

मागील वर्षी 500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला होता. यंदाही 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची राज्य सरकारची परवानगी मिळणे गरजेचे आहे. तसा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळेला नाही. 
....
गेल्या वर्षी 335 कोटींचे नुकसान
मुंबईतील 4 लाख 20 हजार मालमत्ता धारकांकडून करवसूल केला जातो. त्यातील 1 लाख 37 हजार मालमत्ता धारकांची घरे 500 चौरस फुटा पेक्षा कमी आहेत. गेल्या वर्षी या मालमत्ता धारकांना करमाफी दिल्याने पालिकेला 335 कोटींचे नुकसान झाले होते.

तब्बल 24 टक्के हिस्सा
मालमत्ता कर मुंबई महापालिकेच्या उत्पन्नातील प्रमुख स्त्रोत असून एकूण महसुलाच्या 24 टक्के उत्पन्न मालमत्ता करातून मिळते. यंदाच्या वर्षात पालिकेला मालमत्ता करातून 6 हजार 788 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज होता. मात्र, करवाढ केली नाही तर पालिकेचा किती महसुल कमी होईल याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT