मुंबई

बसगाड्यांमध्ये नव्हे, रांगेतच जीव गुदमरतोय; वाचा मुंबईकर काय म्हणतायत...

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईसह उपनगरातील सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद असल्याने बेस्टसह स्थानिक परिवहनसेवेवरच नोकरदारांचा प्रवास अवलंबून आहे. त्यामुळे बस डेपोतूच बसगाड्या भरत असून मधल्या थांब्यावरील प्रवाशांचा जीव रांगतेच गुदमरतोय. तोंडाला मास्क लावलेल्या अवस्थेत तब्बल एक ते दीड तास बस मिळेपर्यंत प्रतिक्षा करताना प्रवाशांचा जीव गुदमरत आहे. 

मुंबईत सध्या 3 हजार 300 च्या आसपास बसगाड्या रस्त्यावर असून कामकाजाच्या दिवशी प्रवाशांची संख्या 13 ते 14 लाखाच्या आसपास असते, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार 25 प्रवाशांना बसून आणि पाच प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे बसगाड्या डेपोमध्येच भरुन जात आहे. बस क्षमतेनुसार भरल्यानंतर मधल्या थांब्यावर थांबवली जात नाही. त्यामुळे या प्रवाशांची चांगलीच कोंडी होत होती. मरिन लाईन्स ते दहिसरपर्यंतच्या प्रत्यक्ष प्रवासाला रस्त्यांवर वाहतूक कमी असल्याने दिड ते दोन तास लागतात. मात्र त्यासाठी एक ते दीड तास बसची प्रतिक्षा करत थांबावे लागत असल्याचे प्रवासी संदिप जाधव यांनी सांगितले.

घाटकोपर ते वर्सोवा असा प्रवास करणारे रोहन कदम म्हणाले की, प्रवासापेक्षा बसची प्रतिक्षा करण्यातच जास्त वेळ लागतो. घाटकोपर ते मरोळ अशी एक बस त्यानंतर मरोळहून वर्सोवाला जाण्यासाठी दुसरी बस पकडावी लागते. मरोळ ते वर्सोवा एकच बस असल्याने एक ते दीड तासाची प्रतिक्षा करावी लागते. त्यात मास्क लावल्यामुळे अधिक त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. बेस्टने काही अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या संस्थासाठी बसगाड्या भाड्याने दिल्या आहेत. या बस थेट विरारपर्यंत जातात. मात्र,बसगाड्यांची संख्या अपुरी असल्याने तेथेही या कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

डेपोतच बसगाड्या भरत असल्याने काही महत्वाच्या ठिकाणांवरुन अतिरीक्त बसगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच दादर टी.टी. सारख्या मध्यवर्ती ठिकाणीही तिकीट तपासणीस नियुक्त करण्यात आले असून आवश्‍यकता वाटेल तशी जवळच्या डेपोतूनही जादा बसगाड्या मागवल्या जातात. तसेच काही वेळा डेपोसह नंतरच्या दोन स्थानकांच्या पुढील प्रवाशांसाठीही बसेस सोडल्या जातात. मात्र त्यांची संख्या अपुरी आहे. 

------- 
असा होऊ शकतो पर्याय 

  • एसटीच्या पॉईंट टू पॉईट सेवा सुरु कराव्यात. 
  • महामुंबईबाहेरून एसटीच्या जादा बसगाड्या मागवता येऊ शकतात. 
  • मधल्या प्रवाशांसाठी डेपोतून रिकाम्या बसगाड्या सोडाव्यात. 
  • खासगी बसगाड्यांनाही बेस्ट मार्फत पॉईंट टू पॉईंट सुविधा सुरु करण्याची परवानगी द्यावी.

----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT