Nana-Patole-Cycle
Nana-Patole-Cycle 
मुंबई

सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं; भाजपचा काँग्रेसला टोला

विराज भागवत

भाजपचे केशव उपाध्ये यांनी नाना पटोलेंसाठी केलं खोचक ट्वीट

मुंबई: काँग्रेसने (Congress) शनिवारी मुंबईत इंधन दरवाढीविरोधात मोर्चा (Mumbai Morcha) काढला. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Prices Hike) वाढत्या किंमतींविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (Congress Workers) या मोर्चासाठी खास बैलगाडी (bullock cart) आणली होती. बैलगाडीवर उभे राहून काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सत्ताधारी भाजपविरोधात घोषणाबाजी करत होते. पण अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या वजनामुळे बैलगाडी तुटली आणि मुंबई अध्यक्ष भाई जगतापांसह सारेच जण खाली पडले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आंदोलनाचे गांभीर्य काहीसे कमी झाले. आता आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देण्यासाठी सायकलने जाणार आहे. त्यावरून भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला. (Nana Patole Trolled by BJP Keshav Upadhye regarding Cycle Rally to Raj Bhavan after Bullock Cart break down Incidence)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेले काही दिवस आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत आहेत. त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्यापासून ते मरणासन्न अवस्थेत असलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करत आहेत. आज त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देण्यासाठी मलबार हिल हँगींग गार्डन येथून ११ वा. सायकलने राजभवनावर जाणार. काही दिवसांपूर्वी अशाच एका आंदोलनामध्ये बैलगाडीचा वापर झाला आणि ती बैलगाडी तुटल्याने आंदोलनाचं हसं झालं. आता मलबार हिल रस्त्यावर तीव्र उतार आहे. त्यामुळे बैलगाडीवरून कोसळलेली काँग्रेस जशी घरंगळत जात आहे तसेच मलबार हिलच्या उतारावरून सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं, असा टोला नाना पटोले आणि काँग्रेसला केशव उपाध्ये यांनी ट्वीटच्या माध्यमातून लगावला.

दरम्यान, काँग्रेसच्या या बैलगाडी मोडण्याच्या घटनेनंतरही भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली होती. "गाढवांचा भार उचलायला बैलांचा नकार! भाई जगताप, तुम्हाला सांगू इच्छितो की माणसाने झेपेल तेवढंचं करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना त्या मुक्या जीवांचा विचार करावा!'", अशा शब्दात आमदार प्रसाद लाड यांनी खिल्ली उडवली होती. तर, 'तोल सांभाळा ⁦भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळलात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे, याचा आधीच विचार करा", असा टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT