Metro
Metro Sakal
मुंबई

Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांच्या मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Metro - नवी मुंबई मेट्रोचे काम एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे आदेश सिडकोने महामेट्रोला दिले आहेत. याच अनुषंगाने येत्या १७ एप्रिलपासून रेल्वे विभागाकडून पेंधर ते तळोजा मेट्रो मार्गावर अंतिम चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे.

सिडकोने बेलापूर ते पेंधर या अकरा किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम २०११ मध्ये सुरू केले आहे. ही सेवा पहिल्या चार वर्षांत सुरू होईल, असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र, या दरम्यान आलेल्या विविध अडचणींमुळे काम रखडल्याने मेट्रोतून प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही.

त्यामुळे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाच्या देखभालीचे हे काम महामेट्रोला दिले आहे. सद्यस्थितीत खारघर ते बेलापूर सेंट्रल पार्क, उत्सव चौक, बेलपाडा, आरबीआय कॉलनी आणि बेलापूर मेट्रो स्थानकाचे काम अतिशय वेगाने करण्यात येत आहे.

तसेच सिडकोने एप्रिल अखेरपर्यंत बेलापूर ते पेंधर मार्गाचे काम पूर्ण करावे, असे आदेश महामेट्रोला दिले आहेत. त्यामुळे येत्या १७ एप्रिल पासून रेल्वे विभागाकडून पेंधर ते तळोजा मेट्रो मार्गावर अंतिम चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी पूर्ण होताच रेल्वेकडून प्रमाण मिळाल्यानंतर नवी मुंबई मेट्रोला सिडकोकडून हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.

पुन्हा नवीन मुहूर्ताची चर्चा

गेल्या वर्षी पेंधर ते खारघर सेंट्रल पार्क या किमान पाच किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम झाल्यानंतर रेल्वेच्या रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ)कडून वेग आणि इतर प्रमाणपत्र मिळाले होते. तसेच तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी या मार्गावर मेट्रोचा प्रवास केला होता.

त्यामुळे मेट्रो सुरू होईल, अशी चर्चा सुरू होती. अशातच आता बेलापूर ते पेंधर मार्गांवरील रेल्वे ट्रॅक, वीजवाहिन्या, सीसी टीव्ही नियंत्रण कक्ष, रेल्वेस्थानकावरील सरकत्या जिन्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच प्रत्येक स्थानकावर वाहनतळाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मे महिन्यात सेवा सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बेलापूर ते पेंधर नवी मुंबई मेट्रोची अंतिम चाचणी रेल्वे विभागाकडून १७ एप्रिलपासून सुरू केली जाणार आहे. अंतिम चाचणीचे प्रमाणपत्र मिळताच योग्य वेळी नवी मुंबई मेट्रो सुरू केली जाईल.

- कैलाश शिंदे, सह-व्यवस्थापकीय संचालक, सिडको

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT