conflagration  sakal media
मुंबई

पनवेलमधील टेकड्यांवर वणवा; हिरवेगार डोंगर झाले काळेकुट्ट

सकाळ वृत्तसेवा

नवीन पनवेल : पनवेलपासून (Panvel) हाकेच्या अंतरावर असलेल्या पूर्व भागातील टेकड्या गेली दोन दिवस धुमसत आहेत. टेकड्यांवरील गवत, झाडे-झुडपांना आगी लागण्याचे (Fire in mountain) प्रमाण वाढत आहे. त्‍यामुळे महिनाभरापूर्वी हिरव्यागार दिसणाऱ्या टेकड्या काळ्याकुट्ट दिसू लागल्या आहेत. पनवेल तालुक्यातील डोंगरांवर अनेक सामाजिक संस्‍था, पर्यावरण प्रेमींकडून (environmentalist) झाडे लावली जातात. मात्र काही समाजकंटकांकडून जाणूनबुजून वणवे लावले जात असल्‍याने वनसंपदेचा ऱ्हास होत आहे.

पनवेल परिसरातील डोंगर व टेकड्यांना आगी लागण्याचे सत्र सुरू असतानाच, पनवेलच्या पूर्वेकडील वलप, वळवली, वाकडी या ठिकाणच्या टेकड्याही दोन दिवसांपासून धुमसत असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात वन विभागाला अपयश येत आहे. यात डोंगरावरील वनसंपदा खाक होत असल्याने वन्यजीवांनाही धोका निर्माण झाला आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून राज्य सरकारनेही वृक्षसंवर्धन व संरक्षणावर भर दिल्यामुळे पावसाळ्यात अनेक सेवाभावी संस्था, मंडळे, सामाजिक कार्यकर्त्‍यांकडून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते. मात्र काही समाजकंटकांद्वारे टेकड्यांना आगी लावल्या जात असल्‍याने झाडे खाक होतात. खारघर टेकडीप्रमाणे या ही ठिकाणी आग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT