water scarcity
water scarcity sakal media
मुंबई

नवी मुंबईत ४८ तास पाणीपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा

वाशी : एमआयडीसीची (MIDC) जलवाहिनी फुटल्यामुळे (pipeline breaks) नवी मुंबईकरांचे पाण्यावाचून हाल झाले. जवळपास ४८ तास पाणीपुरवठा खंडित (water scarcity) होता.
एमआयडीसीकडून जीर्ण झालेल्या जलवाहिनी बदलून नव्याने टाकण्यासाठी गुरुवारी रात्री बारापासून शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात आला होता; मात्र शनिवारी रात्री पाणी सोडण्यात आल्यानंतर पुन्हा शिळ फाट्याजवळील देसाई नाक्याजवळ जलवाहिनी फुटली.

त्यामुळे एमआयडीसीच्या बारावी धरणातून पाणी मिळणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिघा, रबाळे, औद्योगिक क्षेत्र, ऐरोलीतील काही भागांत शनिवारी दिवसभर पाणी आले नव्हते. त्यामुळे येथील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. शनिवारी दिवसभर पाणी आले नव्हते, तर शनिवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होऊन रविवारी सकाळपर्यंत पाणी येण्याची शक्यता असल्याचे एमआयडीसीचे उपअभियंता एम. एस. गीते यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे औद्योगिक परिसरातील कारखानदारांसह झोपडपट्टीतील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Sakal Podcast : सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

सह्याद्रीचा माथा : नाशिकचा चक्रव्यूह कोण, कसा भेदणार? 

सोलापूरमध्ये रमेश कदमांची भूमिका ठरणार निर्णायक? २८ एप्रिलच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचं लक्ष

SCROLL FOR NEXT