water scarcity sakal media
मुंबई

नवी मुंबईत ४८ तास पाणीपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा

वाशी : एमआयडीसीची (MIDC) जलवाहिनी फुटल्यामुळे (pipeline breaks) नवी मुंबईकरांचे पाण्यावाचून हाल झाले. जवळपास ४८ तास पाणीपुरवठा खंडित (water scarcity) होता.
एमआयडीसीकडून जीर्ण झालेल्या जलवाहिनी बदलून नव्याने टाकण्यासाठी गुरुवारी रात्री बारापासून शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात आला होता; मात्र शनिवारी रात्री पाणी सोडण्यात आल्यानंतर पुन्हा शिळ फाट्याजवळील देसाई नाक्याजवळ जलवाहिनी फुटली.

त्यामुळे एमआयडीसीच्या बारावी धरणातून पाणी मिळणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिघा, रबाळे, औद्योगिक क्षेत्र, ऐरोलीतील काही भागांत शनिवारी दिवसभर पाणी आले नव्हते. त्यामुळे येथील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. शनिवारी दिवसभर पाणी आले नव्हते, तर शनिवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होऊन रविवारी सकाळपर्यंत पाणी येण्याची शक्यता असल्याचे एमआयडीसीचे उपअभियंता एम. एस. गीते यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे औद्योगिक परिसरातील कारखानदारांसह झोपडपट्टीतील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT