मुंबई

ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स

पूजा विचारे

मुंबईः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुंबईमध्ये २०० किलो ड्रग्स जप्त केल्यानंतर समीर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 

समीर खान यांचं लग्न नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांच्याशी झालं आहे.  समीर खान आणि करण संजानी यांच्यात 'गुगल पे'च्या माध्यमातून २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता, अशी माहिती एनसीबीच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे ड्रग्स पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला असल्याचा संशय एनसीबीला आहे. त्याचीच पडताळणी करण्यासाठी एनसीबीनं समीर खान यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

एनसीबीच्या पथकानं गेल्या आठवड्यात खार परिसरातून ब्रिटीश नागरिक असलेला करण संजानी आणि राहिल फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून एनसीबीनं २०० किलो ड्रग्स जप्त करण्यात आलं होतं.

मंगळवारी एनसीबीनं मुंबईमध्ये मुच्छड पानवाला राजकुमार तिवारी याला अटक केली होती. आता राजकुमार तिवारी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ncp minister nawab malik son in law sameer khan ncb Summons by ncb

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT