माणगाव (बातमीदार) ः नाशिक येथील अपघातामुळे रस्त्यावरील विहिरींसंदर्भात प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माणगावसह जिल्ह्यातील रस्त्यावरील गावाशेजारील विहिरीला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी प्रवासी व स्थानिकांच्या वतीने करण्यात येत आहे. माणगाव-दिघी रस्ता अलीकडील काळात वाहतुकीचे प्रमुख मार्ग बनले असून, या रस्त्याचे रुंदीकरण होत आहे.
या रुंदीकरणात सुधारित रस्त्याची उंची वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील म्हसळा तालुक्यातील बनोटी गावाजवळ रस्त्यालगत असणारी गण्याढवाची विहीर या नवीन बांधकामामुळे रस्त्याच्या उंचीबरोबर झाली आहे. या ठिकाणी नाशिकमधील झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर अशा प्रकारे रस्त्यालगत असलेल्या विहिरींजवळ अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई
अनेक ठिकाणी रस्त्याच्या वाढलेल्या उंचीने विहिरी रस्त्याबरोबर झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्या विहिरी लक्षात येत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यास वाहन विहिरीत जाण्याचा धोका आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नाशिकमधील झालेली घटना दुर्दैवी आहे. रायगडमध्येही अशा अनेक विहिरी रस्त्यालगत असून, त्यांना सुरक्षा कठडे बांधण्याची गरज आहे. नाहीतर या ठिकाणीही अपघात होऊ शकतो.
- काशिनाथ गाणेकर, माणगाव
बनोटी गावाजवळील गण्याढवाची विहीर ५० फूट खोल आहे. नवीन रस्ते बांधकामात विहीर रस्त्याच्या उंचीबरोबर झाली आहे. त्यामुळे अपघात होऊ शकतो. त्वरित या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधावी.
- व्यास कांबळे, म्हसळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.