दिवसेंदिवस तीव्र होणाऱ्या उन्हाळ्यासोबत राज्यात विजेची गरज वाढली आहे. मात्र, सुरळीत पुरवठा होत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सध्या राज्यात लोडशेडिंग करण्याची वेळ आली आहे. आम्ही CGPL कंपनीकडून अतिरिक्त वीज विकत घेत असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. सध्या राज्याला २८ हजार ७०० मेगा वॅट विजेची गरज आहे. जूनपर्यंत ३० हजार मेगावॅट जाणार असल्याची शक्यता राऊत यांनी व्यक्त केली आहे. (Nitin Raut Speaks On Loadshading in Maharashtra)
आज राज्यमंत्री मंडळाची विशेष बैठक झाली. राज्यावरील लोडशेडिंग टाळण्यासाठी या बैठकीत आधीच्या करारापेक्षा वाढीव दराने वीज खरेदी करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलाय. (Nitin Raut)
कोळशाचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध होत नसल्याने हे संकट गडद झालं आहे. कोळसा साठा उपलब्ध झाला, तर त्याची वाहतूक करण्यासाठी रेल्वे ट्रॅक उपलब्ध होत नसल्याचं म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्राकडे बोट दाखवलं आहे. सध्या कोयना धरणार 17 TMC पाणीसाठा आहे. वीजनिर्मितीसाठी एका दिवसाला 1 TMC पाणी लागते. त्यानुसार 17 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारनियम वाढण्याची शक्यता ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने टाटा कंपनीच्या सीजीपीएल कडून 760 मेगा wat वीज खरेदी करणार आहे.या मुद्रा येथील प्रकल्पाबाबत एक करार केला होता. त्यानुसार, साडेतीन रुपये प्रतियुनिट वीज मिळणार होती. मात्र, आता देशात कोळशाचा प्रचंड तुटवडा आहे.
अशा परिस्थिती कंपनीला कोळसा आयात करावा लागत आहे. त्याचे दर अधिक आहेत. त्यामुळे सहा रुपये दराने वीज देण्यास कंपनीने अनुकूलता दर्शविली आहे. मात्र, साडेतीन रुपयांऐवजी सहा रुपये दराने वीज खरेदी करण्याबाबतचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाला घ्यावा लागणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.