मुंबई

सरकारने काढला GR, आता 'सारथी'ची जबाबदारी अजित पवारांकडे

सुमित बागुल

मुंबई : सारथी सोबतच मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार आता अजित पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने आज याबाबतचा GR जारी करून सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची सर्व जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केलेली आहे.

मराठा समाजासाठीच्या योजना राबवण्याची जबाबदारी काँग्रेसचे नेते, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे होती. सारथी संस्थेची जबाबदारीही विजय वडेट्टीवार सांभाळत होते. मात्र, आज सरकारने याबाबतचा शासन निर्णय काढून सारथी सोबत मराठा समाजासाथीच्या योजना राबवण्याची सर्व जबाबदारी नियोजन विभाग म्हणजेच अजित पवारांकडे वर्ग केलेली आहे. 

गेल्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणावरून, मराठा समाजासाथीच्या बाळकटीकरणासाठीच्या सारथी संस्थेसाठी देण्यात येणाऱ्या निधीवरून, SEBC मधील विविध योजनांकडे दुर्लक्ष होतंय अशी चर्च रंगलेली. विजय वडेट्टीवार हे OBC समाजाचे नेते असल्याने त्यांच्यावर ही टीका देखील झाली. यानंतर स्वतः काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवर यांनी सारथीची सर्व जबाबदारी अजित पवारांकडे द्यावी असं सुचवलं होतं. मात्र याला काँग्रेसने विरोधही केला होता. सारथी काँग्रेकडे असल्याने सारथीची जबाबदारी विजय वडेट्टीवारांकडेच राहावी असाही काँग्रेसचा सूर होता. 

नुकतीच मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजात तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, आता सारथीची जबाबदारी आणि SEBC मधील योजनांची जबाबदारी नियोजन विभागाकडे म्हणजे अजित पवारांकडे गेल्याने निधीबाबतच्या अडचणी पुढील काळात उद्भवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. मात्र या निर्णयाला काँग्रेस कशाप्रकारे स्वीकारते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.   

now responsibility of sarthi will be handled by ajit pawar as head of planing department

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT