मुंबई

"माझ्या घोषणांमुळे महाराष्ट्रात कोरोनाचे कमी रुग्ण" - रामदास आवठवले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जगभरात कोरोनाने आपले हातपाय पसरलेत. त्यात आता महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र रामदास आठवले आपल्या हटके स्टाईलमध्ये कोरोनाला मात द्यायला निघाले आहेत. काही दिवसांपूर्वी 'गो कोरोना..कोरोना गो' अशा घोषणा रामदास आठवले यांनी दिल्या होत्या. आपण अशा घोषणा दिल्या म्हणूनच राज्यात कोरोनाचे कमी रुग्ण आहेत असं आता त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय तर रामदास आठवले यांच्या फक्त घोषणाबाजीमुळे कोरोना घाबरला असं आठवलेंचं म्हणणं आहे.    

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये कोरोनासंदर्भातील जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारफेरीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना… गो… गो कोरोना…’ अशी घोषणाबाजी केली होती. त्यावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. मात्र आता मी ‘गो कोरोना…कोरोना गो…’ अशी घोषणाबाजी केल्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचे कमी रुग्ण आहेत असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

मी जायला सांगितलं म्हणून गेला कोरोना :

“मी 'गो कोरोना' असं म्हटलं आहे. त्यामुळे तो महाराष्ट्र काय तर भारतामध्येही जास्त पसरला नाहीये. तरीही सरकारकडून यासंदर्भात काळजी घेतली जात आहे. आम्ही कोरोनाला जायला सांगितलं आहे. मात्र तो होऊ नये याची काळजी घेणं आपली आणि डॉक्टरांची जबाबदारी आहे. आपल्या गावामध्ये आणि आपल्यामध्ये  कोरोना येता कामा नये यासाठी आपणही काळजी घेणं गरजेचं आहे,” असं मत आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलंय. 

“गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना म्हणू का?”

रामदास आठवलेंनी त्यांना ट्रोल करणाऱ्यांनाही चांगलाच टोला लगावलाय. “एवढा गंभीर आजार देशात दाखल झाला असताना कोरोना गो नाही, तर मग काय कोरोना ये असं म्हणणार आहे का ? कोरोना कम असं मी कधीच म्हणणार नाही. कोरोना गो असंच मी म्हणेन. यावरुन टीका करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. माझ्यावर टीका करणाऱ्या कोणावरही मी टीका करणार नाही. कोरोना गो म्हणजे कोरोनाने इथून जावं अशी माझी भूमिका आहे. कोरोनाने इथे  येऊ नये आणि आला असेल तर इथून जावं अशी प्रतिकात्मक भूमिका मी घेतली आहे. कोरोना देशातून जात नाही तोपर्यंत मी गो कोरोना असंच म्हणत राहीन,” असं रामदास  आठवलेंनी म्हंटलंय. 

त्यामुळे रामदास आठवलेंनी फक्त घोषणा दिल्यामुळे कोरोना घाबरला आणि म्हणून कोरोनचे कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.  

only few patients of corona found in maharashtra due to my slogans said ramdaas aathawale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT