मुंबई

P305 दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना ३५ ते ७५ लाखाची मदत

कृष्णा जोशी

मुंबई: चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात (arbian sea) पी 305 बार्ज बुडून (P 305 barje sank) झालेल्या दुर्घटनेतील ५१ मृतदेह आतापर्यंत सापडले असून अद्याप २४ जण बेपत्ता आहेत. तर अ‍ॅफकॉन कनस्ट्रक्शनकडूनही मृतांच्या नातलगांना ३५ ते ७५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (P 305 barje sank in arbian sea dead employees family members get 75 lakh help)

दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे काम अद्यापही नौदल व तटरक्षक दलातर्फे सुरू आहे. नौदलाची टेहळणी विमाने अत्याधुनिक उपकरणांमार्फत तर हेलिकॉप्टर कमी उंचीवरून उड्डाण करून भरसमुद्रात शोध घेत आहेत. त्याखेरीज नौदलाच्या युद्धनौका व स्पीडबोट देखील समुद्रात शोध घेत आहेत. ५१ पैकी ४९ मृतदेह नौदलाकडून मुंबईत आणले गेले आहेत.

अ‍ॅफकॉनकडून मदत जाहीर

या दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या नोकरीतील शिल्लक कालावधीतील दहा वर्षांपर्यंतचा पगार तसेच विमा रक्कम त्यांच्या नातलगांना दिली जाईल. ही रक्कम सुमारे ३५ ते ७५ लाखांपर्यंत असेल, असे अ‍ॅफकॉन न्स्ट्रक्शनतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मृतांच्या अपत्यांच्या शिक्षणासाठी ट्रस्ट उभारण्यात येईल व त्याद्वारे त्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. तर या अपघातामुळे मानसिक आघात झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशनाचीही व्यवस्था केली जाईल, असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT