मुंबई

पालघर साधु हत्या प्रकरण : अठरा पोलिसांवर सरकारकडून कारवाई

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 7 : पालघरमधील साधुंच्या हत्येबाबत राज्य सरकारने आतापर्यंत एकूण 18 पोलिसांवर कारवाई केली आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.

राज्य सरकारने एका पोलिस अधिकाऱ्याला पदच्युत केले आहे. तर दोघांना सक्तीची निव्रुत्ती दिली आहे. याचबरोबर पंधरा जणांवर वेतन कपातीची कारवाई केली आहे. पालघरमध्ये दोन साधूंसह तिघांची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली होती. याप्रकरणी सीबीआय तपासणी केली जावी अशी मागणी शशांक झा यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या मागणीला विरोध करणारे पुरवणी प्रतिज्ञापत्र सरकारकडून आज दाखल करण्यात आले. यामध्ये तपासाचा कृती अहवाल देखील दाखल करण्यात आला.

राज्य सरकारने याप्रकरणी विभागीय चौकशी केली असून संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच 252 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. पुण्यातील गुन्हा तपास विभागाने तपास केल्यानंतर यामध्ये पालघर आणि ठाणे बाल न्यायालयात दोन आरोपपत्र दाखल केले आहे.

न्यायालयाने या प्रतिज्ञापत्रावर बाजू मांडण्यासाठी अन्य पक्षकारांना अवधी दिला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी दिनांक 15 नोव्हेंबररोजी होणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

palghar lynching case maharashtra state government took action on 18 policemen

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT