मुंबई

महाविकास आघाडीला झटका, BMC निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

दीनानाथ परब

मुंबई: आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक (bmc election) काँग्रेस महाविकास आघाडी (mva govt) सोबत लढवणार नाही. काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढेल असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी स्पष्ट केले. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून स्वबळाची भाषा सुरु आहे. त्याचे पडसादही महाविकास आघाडीमध्ये उमटताना दिसत आहेत. आता भाई जगताप (bhai jagtap) यांनी, पुढच्यावर्षी होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिलं आहे. (party will go solo in BMC elections Mumbai Congress chief bhai jagtap )

"मी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वच्या सर्व २२७ जागा लढवेल असे सांगत आहे. हे असं पहिल्यांदा घडत नाहीय. १९९९ ते २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि आरपीआयसोबत आम्ही सत्तेमध्ये होतो. पण मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली" असे भाई जगताप म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच बोलताना 'चप्पला'चा उल्लेख केला होता. त्यावर "मुख्यमंत्र्यांनी हे विधान त्यांच्या पक्षाला प्रोत्साहित करण्यासाठी केले असेल. आगामी मुंबई महापालिकेचा विचार केला, तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल" असे जगताप यांनी सांगितले.

"लोकांच्या अडचणींवर उपाय शोधल्याशिवाय जे लोक स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याबद्दल बोलतायत, त्यांना लोक जोड्याने मारतील" असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. शनिवारी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी कोणाचेही नाव न घेता सहकारी पक्षांवर टीका केली होती. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा १४ जूनलाच काँग्रेस आगामी विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीसोबत न लढता स्वबळावर लढेल असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून स्वबळाच्या विधानावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT