मजुरांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे भरणार; राज्य सरकारचा निर्णय 
मुंबई

मजुरांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे भरणार; राज्य सरकारचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात अडकलेल्या मजूरांचे रेल्वे तिकीटाचे पैसै भरण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातून हजारो मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत.  तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. 

लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्या या मजूरांकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत. कामगारांची परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  हा निर्णय घेतला आहे. या तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून भरण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मजूरांना मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाने काढला आहे. 

राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून परराज्यातील मजूर, पर्यटक, नागरिक मोठ्या संख्येने राज्यात अडकून पडले आहेत. परराज्यातील मजुरांची संख्या किती आहे. त्याचे नियोजन महसूल विभाग, गृहखाते, महापालिका प्रशासन सध्या करीत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. त्यानुसार रेल्वे प्रवासाच्या खर्चाचा भार उचलावा लागत आहे. याच बरोबर इतर राज्यांत अडकून पडलेल्या राज्यातील मजूर, पर्यटक, प्रवासी यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याही प्रवास खर्चाचा भार राज्याला उचलावा लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT