मुंबई

परदेशातून परतणाऱ्यांबाबत मोठी बातमी - परदेशातून येणार्यांना थेट 'इथे' पाठवणार...  

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : परदेशातून मुंबई येणार्या भारतीयांच्या त्यांच्या मुळ जिल्ह्यात पाठविण्यात येणार आहे. फक्त कोरोना सदृष्य लक्षणं असलेल्या व्यक्तींना मुंबईत ठेवण्यात येणार आहे. या प्रवाशांना 14 दिवस सरकारी केंद्रात राहाणे बंधनकार असून त्यानंतर 14 दिवस घरी एकांतात राहावे लागणार आहे. 

परदेशातील भारतीयांना आणण्यासाठी केंद्र सरकार विशेष मोहिम राबवणार आहे. त्यात मुंबई विमानतळावर अनेक नागरिक उतरण्याची शक्यता आहे. या प्रवांशामची विमानतळावर प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहेत. त्या कोरोना सदृष्य लक्षणं असलेल्या प्रवाशांना मुंबईत उपचारासाठी ठेवण्यात येईल. इतराांना त्याच्या राज्यात जिल्ह्यात पाठविण्यात येणार आहे. विमानतळावर त्यांच्यासाठी वाहानांची सोयही करण्याचा विचार सुरु आहे.

महामुंबईतील प्रवशांना फक्त मुंबईत क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कोणतीही लक्षणं नसलेल्या प्रवाशाला भारतात 14 दिवस सरकारी केंद्रांमध्ये क्वारंटाईन होणे सक्तीचे आहे. या काळातला खर्चही संबंधित व्यक्तीने द्यायचा आहे. 14 दिवासाच्या कालावधित प्रवाशात कोरोनाची कोणतीही लक्षणं न दिसल्यास त्याला घरी पाठवण्यात येईल.मात्र, त्यानंतरची 14 दिवसही घरात एकांतात राहावे लागणार आहे. 

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रवासांसाठीची नियमावली तयार करण्यात आली आहे.अशी माहिती पालिकेच्या एका अधिकार्याने दिली .मुंबईत फक्त महामुंबईतील प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. इतर जिल्हातील राज्यातील प्रवाशांना त्याच्या मुळ ठिकाणी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

people returning from mumbai will be sent to their respected districts

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT