मुंबई

ठाकरे स्मारकावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक; मुंबईत राजकीय घडामोडीना वेग...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - एकीकडे कोरोनाचा वाढता आकडा आणि दुरीकडे महाराष्ट्रात रंगलेलं राजकारण. दोन्ही बाबींमुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघतंय. आज सकाळी शिवसेनेचे नेते, राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळाल्या. संजय राऊतांनी त्यांची आणि राज्यपालांची भेट ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलंय. यानंतर लगेचच आणखी एक मोठी राजकीय घडामोड मुंबईमध्ये घडली. 

एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा सामना तर दुरीकडे राजकीय आरोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळतायत. संजय राऊत यांच्या राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे स्मारकात आणखीन एक महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी  काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.

ठाकरे स्मारकावर पार पडलेल्या बैठकीत जयंत पाटील आणि अजोय मेहता हे देखील उपस्थित होते. यामध्ये मुख्यत्त्वे राज्याचं अर्थचक्र कशा पद्धतीनं पुन्हा रुळावर आणायचं, केंद्राकडून महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करण्यासाठी केंद्राशी कसं बोलणं केलं पाहिजे, ३१ तारखेनंतर रेडझोनमध्ये कोरोना कशाप्रकारे उपाययोजना केल्या जाव्यात याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. या बैठकीत कोरोना संदर्भातील उपाय योजना यासोबतच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे.

political happenings taking pace in mumbai sharad pawar and cm uddhav thackeray met at thackeray samarak 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT