मुंबई

पुणे-मुंबई रेल्वे सेवा ठप्प; अतिवृष्टीमुळे मंकी हिल रुळावर दरड कोसळली...

सकाळ वृत्तसेवा

खोपोली : सोमवारी सकाळपासून खोपोली, खालापूर व कर्जत परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रात्री मंकी हिल पॉईंटजवळ दरड कोसळली. यामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यात रात्रीची वेळ असल्याने अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. प्रशासन, स्थानिक संस्था आणि तरुणांच्या मदतीने ठिकठिकाणी अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

खोपोली रेल्वेस्थानकात लोकलने आलेल्या प्रवाशांची सोय करण्यासाठी खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी खोपोली आपत्कालीन सामाजिक ग्रुपला पाचारण मदतीचे आवाहन केले. त्यानुसार तत्काळ गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, मितेश शहा, धर्मेंद्र रावळ, अमोल कदम, अमित खिसमतराव, सुनील पुरी यांनी रेल्वेस्थानक गाठले. दरम्यान, एसटी महामंडळाच्या तीन बसेसही त्या ठिकाणी तहसीलदारांनी बोलावल्या. त्याचसोबत मिनीडोअर, रिक्षा, टेम्पो आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवून 300 पेक्षा जास्त प्रवाशांना पुढे पाठवण्याची सोय केली. महसूलचे अधिकारी दीपक लोते, तुराफ शेठ यांनीदेखील मदतीस हातभार लावला. तहसीलदार चप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली मध्यरात्री 2.30 वाजता सुरू झालेले मदतीचे कार्य पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होते.

फार्म हाऊसमध्येही अडकलेले 30 पर्यटक
हे कार्य संपत नाही, तोच मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास चौक गावातील आसरे या ठिकाणी काही पर्यटक सावली नावाच्या फार्म हाऊसमध्ये अडकून पडल्याचा निरोप मिळाला. खोपोली आपत्कालीन मदत करणाऱ्या ग्रुपने त्यानंतर तिकडे धाव घेतली. स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत फार्म हाऊसमध्ये अडकलेल्या एकूण तीन ग्रुपमधील 30 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. त्यात सहा वर्षांचे बाळही होते. सोबत त्या फार्म हाऊसमधील दोन गाई आणि चार पाळलेले कुत्रेही बाहेर काढले. त्यानंतर स्थानिकांनी त्या सर्व पर्यटकांची पुढे जाण्याची सोय केली होती. 

जीते गावात कुटुंब पाण्यात
नेरळ येथील जीते गावात एक कुटुंब पाण्यात अडकून पडल्याची माहिती खोपोली अग्निशमन दलाचे प्रमुख मोहन मोरे यांनी कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना दिली. नदीच्या प्रवाहामुळे या कुटुंबाला चारीबाजूने पाण्याने वेढले होते. तहसीलदार कोष्टी, उपवरिष्ठ पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, पोलिस निरिक्षक अविनाश पाटील यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने कुटुंबाला घरातून बाहेर काढले.

पुरात अडकले दोन तरुण
शेलू गावातील नदीच्या पलीकडे दोन तरुण अडकल्याची माहिती मिळताच नेरुळ पोलिस, खोपोली ग्रुप, प्रशासन यंत्रणा घटनास्थळी पोहचले. एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन स्थानिकांकडून ग्रुपचे सदस्य पुराच्या पाण्यात उडी घेत दोन्ही तरुणांना वाचवले. 

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT