मुंबई

Mumbai Local News: रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे 'फलाट' करतायेत गर्दीमुक्तीच्या दिशेने वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला, कल्याण, डोंबिवली आणि वडाळा रोड रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळताच खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली आहे.

मध्य रेल्वेच्या प्रमुख उपनगरी रेल्वे स्थानकातील गर्दी गेल्या काही दिवसांपासून रेल्वेची मोठी डोकेदुखी ठरत आहे. या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अनेक स्थानकांत पाहणी केली. या पाहणीत रेल्वे फलाटांवरील खाद्यपदार्थ स्टॉल जागा व्यापण्याचे काम करत असल्याचे निदर्शनात आले.

प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होते. त्यामुळे गर्दीच्या रेल्वे स्थानकांतील फलाटांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी मध्य रेल्वेकडून खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुर्ला, कल्याण, डोंबिवली आणि वडाळा रोड रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.

तसेच दादर, ठाणे आणि घाटकोपर स्थानकांतील फलाटांवरील स्टॉल हटवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. स्टॉलधारकांना स्थानकाच्या प्रवेशद्वारालगत रेल्वे हद्दीत पर्यायी जागा देण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर स्टॉलधारकांच्या पसंतीनुसार स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेतील अन्य ठिकाणी त्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT