मुंबई

गेल्या तीन वर्षांपासून रेल्वेचं पाणी बिल मुंबई पालिकेकडे थकीत, अद्याप कारवाई नाही

पूजा विचारे

मुंबईः  रेल्वेनं गेल्या तीन वर्षांपासून पाणी बिल भरलं नसल्याची माहिती समजतेय. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनानं मुंबई महानगरपालिकेचे पाण्याचे बिल गेल्या तीन वर्षांपासून थकवलं आहे.  मुंबई महापालिकेच्या ५२७ कोटी रुपयांच्या पाणी बिलाच्या रेल्वेकडील थकबाकीकडे गेल्या तीन वर्षांपासून पालिकेनंही दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. माहितीच्या अधिकाऱ्यातून मागवलेल्या माहितीतून ही बाब उघडकीस आली आहे.

मुंबई पालिकेकडे रेल्वे प्रशासनाचे जवळपास ५२७ कोटी रुपयांचं पाणी बिल थकीत आहे. त्यात या पाणी बिलाच्या थकबाकीकडेही पालिकेनं दुर्लक्ष केलं आहे. रेल्वे प्रशासनाविरोधात कोणतीही मोठी कारवाई महापालिकेने अद्याप केलेली नाही.

मध्य आणि पश्चिम रेल्वेला मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. नियमित पाण्याची थकबाकी रक्कम रेल्वेकडून पालिका प्रशासन वसूल करण्यात येत नाही आहे.

आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी पालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांच्या मागावलेल्या माहितीच्या अधिकाऱ्यातून ही माहिती समोर आली आहे. २०१७ पासून मध्य रेल्वेचे २३८ कोटी रुपये आणि पश्चिम रेल्वेकडे २८९ असे एकूण ५२७ कोटी रुपयांचे पाण्याचे बिल थकबाकी आहे.

महानगर पालिकेकडून रेल्वेला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच पाण्याची थकबाकी रक्कम वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुद्धा करण्यात आलेले नाहीत.

Railway not paid bmc 527 crore water bill last three years

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साप्ताहिक राशिभविष्य : २८ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६

New Marathi Book Releases 2025 : साहित्याची नवी मेजवानी; कुस्तीच्या लाल मातीपासून ते करिअरच्या यशोगाथेपर्यंत, वाचा ५ खास पुस्तके!

Marathi Literature Fiction : "निसर्ग काही भव्य रचण्यात वा मोडण्यात मग्न आहे..." मानवी अस्तित्वाचा वेध घेणारा एक अस्वस्थ संवाद

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

SCROLL FOR NEXT