मुंबई

आघाडीत बिघाडी निर्माण करणाऱ्या विधानावरून संजय राऊतांचा 'यू टर्न'

पूजा विचारे

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आपल्या वाक्यावरुन यू-टर्न घेतला आहे. रविवारी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या  रोखठोक सदरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामाच्या चर्चांवर भाष्य केलं होतं. त्यात राऊत यांनी देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असं सदरात म्हटलं होतं. मात्र आज संजय राऊत यांनी या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतल्याचं दिसत आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी देशमुखांना गृहमंत्रीपद मिळालं ते अपघाताने. पण हा अपघात वाईट नव्हता. चांगला होता, असं म्हटलं आहे. 

संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख योग्य आहेत. तसंच अतिशय कठीण प्रसंगात त्यांनी गृहखातं नीट सांभाळलं असल्याचंही सांगायला राऊत विसरले नाहीत.  

ज्या विदर्भातून गेली पाच वर्षे मुख्यमंत्री होते, त्याच विदर्भातील एका नेत्याला गृहमंत्रीपदाची संधी देणं ही पवार साहेबांचा मोठेपणा असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  देशमुख अनेक वर्षे पवारांसोबत निष्ठेने काम करत आहेत. देशमुखांना गृहमंत्रीपद मिळालं ते अपघाताने. पण हा अपघात वाईट नव्हता. चांगला होता. जनहिताचा होता, असंही ते म्हणालेत. 

मी सामनाचा संपादक होईन असं मला सुरूवातीला वाटलं नव्हतं. पण मी तो झालो हा गोड अपघात होता. बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी संपादक झालो.अपघात कायम नकारात्मक नसतात. चांगले पण असतात, असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

काय म्हटलं होतं संजय राऊत यांनी

देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलिस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलिस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?. 

परमबीर सिंग यांनी आरोप केले तेव्हा गृह खात्याचे आणि सरकारचे वाभाडे निघाले, पण महाराष्ट्र सरकारचा बचाव करायला एकही महत्त्वाचा मंत्री तत्काळ पुढे आला नाही. चोवीस तास गोंधळाचेच वातावरण निर्माण झाले. लोकांना परमबीर यांचे आरोप सुरुवातीला खरे वाटले याचे कारण सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीही यंत्रणा नाही. एका वसुलीबाज फौजदाराचा बचाव सुरुवातीला विधिमंडळात केला. त्यानंतर परमबीर सिंग यांच्या आरोपांना कुणी उत्तर द्यायला तयार नव्हते व मीडियाचा ताबा काही काळासाठी विरोधी पक्षनेत्यांनी घेतला हे चित्र भयंकर होते.

Saamana rokhthok Anil Deshmukh home minister Sanjay raut u turn

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT