Samir Khan 
मुंबई

Samir Khan Dies: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

Samir Khan Passed Away: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते.

सकाळ ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा अपघात झाला होता. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. याबाबत नवाब मलिक यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात समीर खान यांचा कुर्ल्यात कार अपघात झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई रुग्णालयातून नियमित चेकअपनंतर घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला होता. जेव्हा ते कारमध्ये बसत होते तेव्हा कार चालकानं चुकून एक्सलेटर दाबला. त्यानंतर कार एका भिंतीला जाऊन धडकली. या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र आता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले की, माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो. या नुकसानीबद्दल आम्ही शोक व्यक्त करत असल्याने, पुढील दोन दिवसांचे माझे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद, कृपया त्याला तुमच्या आठवणीत ठेवा.

या अपघातासंदर्भात पोलिसांनी थार चालवणाऱ्या ३८ वर्षीय चालक अबुल मोहम्मद अन्सारी याला ताब्यात घेतले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू होता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT