मुंबई

सरकार बदलण्याच्या मुद्द्यावर संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर

विराज भागवत

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या एका सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केलं. 'सरकार केव्हा पाडायचं आणि नवं सरकार केव्हा आणायचं ते तुम्ही माझ्यावर सोडा', असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्या मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, "फडणवीसांना तसं वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राजकारण ही वैचारिक लढाई आहे. जर फडणवीसांनी नव्या सरकारबद्दलची तारीख ठरवली असेल तर त्यासाठीही त्यांना शुभेच्छा", असं मत खोचक संजय राऊत यांनी दिलं.

लॉकडाउनच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, "सध्या देशात लोक नियम पाळत नाहीत हे उघड आहे. त्यामुळे राज्याऐवजी देशात असा निर्णय लावला तर आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्रातच नव्हे तर हरिद्वार, बंगालमध्ये पण हेच सुरू आहे. राज्यात गुढीपाढव्यामुळे काही ठिकाणी गर्दी दिसतेय. पण त्यात आता लोकांनीच शिस्त पाळली पाहिजे. तसं न झाल्यास लॉकडाउन हा एकच पर्याय आहे."

"पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. त्यात प्रचारादरम्यान नियमभंग केल्याप्रकरणी ममतादीदींवर २४ तासांचा बॅन लावण्यात आला आहे. बंगालमध्ये ममतादीदी सोडून कोणीच नियम मोडले नाहीत का? मला वाटतं हे नवं महाभारत आहे. महाभारतात युद्धाचे कोणतेही नियम पाळले गेले नव्हते. शिखंडीला पुढे करून युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसा बंगालचा शिखंडी कोण? हे पाहावं लागेल", अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

"महाराष्ट्राची वैद्यकीय यंत्रणा सर्वोत्तम आहे. सणांवर निर्बंध लादण्यात कोणालाही आनंद होत नसतो. पण जीवाचा प्रश्न असल्यास सणांवर निर्बंध लावण्याची हिंमत या सरकारमध्ये आहे. नियमांचे नीट पालन झाल्यास पुढील गुढीपाडवा आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त असेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे चाकण महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT