Sanjay Raut on Raj Thackeray  e sakal
मुंबई

भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला : संजय राऊत

हिंदुत्त्वासाठी आणि भाविकांसाठी आजचा दिवस काळा दिवस असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनसेच्या खांद्यावर बंदुक ठेवून भाजपने हिंदुत्वाचा गळा घोटल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. भोंग्याच्या वादामुळे आज अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये सकाळच्या काकड आरतीला (Kakad Aarti) भाविकांना मुकावे लागल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे अनेक भाविकांची गैरसोय झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मनसेमुळेच (MNS) आज लाखो हिंदू भाविकांची गैjसोय झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भोंग्यांबाबतचा नियम सर्वांसाठी समान असून तो कुठल्याही एक धर्मीयांसाठी नाही. देशभरात उत्तर प्रदेशात याच नियमाचं पालन झालं आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका सर्वात जास्त कुणाला बसला असेल तर, तो हिंदू तीर्थस्थानं, मंदिरं आणि हिंदू भाविकांना बसल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. (Sanjay Raut Attack On Raj Thackeray & BJP)

मशिदींवरील भोग्यांचं निमित्त करून भाजपने (BJP) हिंदूंचा आणि हिंदुत्त्वाचा गळा घोटल्याचं स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. आज सकाळपासून हजारो नागरिकांना फोन, पत्र अशा अनेक पद्धतींने तक्रारी करत आमच्यावर हा अन्याय का होतोय? आमचा गुन्हा काय? असा प्रश्न विचारल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आज सकाळी शिर्डीमध्ये काकड आरतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र, ही आरती भाविकांना ऐकू न आल्याने त्यांचा हिरमोड झाल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Shirdi Kakad Arati)

मनसेमुळेच आज लाखो हिंदू भाविकांची गैरसोय झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे हिंदुत्त्वासाठी आणि भाविकांसाठी आजचा दिवस काळा दिवस असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर हिंदुनी संयम राखावा असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले आहे. भोंग्यांबाबतचा नियम सर्वांसाठी समान असून तो कुठल्याही एक धर्मीयांसाठी नाही. देशभरात उत्तर प्रदेशात याच नियमाचं पालन झालं आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका सर्वात जास्त कुणाला बसला असेल तर, तो हिंदू तीर्थस्थानं, मंदिरं आणि हिंदू भाविकांना बसल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रातील भोग्यांबाबत काय करायचं यासाठी कायदा आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. त्यानुसारच कारवाई होईल. मशिदींवरील भोग्यांचा निर्णय खासगी व्यक्ती घेऊ शकत नाही असे सांगत सुप्रीम कोर्टाच्या वर कुणीही नाही. जर तुम्ही समान नागरी म्हणत असाल तर, एक कायदा सर्वांसाठी आहे. त्यालाच समान नागरी कायदा म्हटले जाते. भोंग्यांचा हा वाद धार्मिकच असून, हे भारतीय जनता पक्षाचं कारस्थान असून, भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT