मुंबई

राज्यातील मंदिरं खुली करण्याबाबत संजय राऊतांचं 'मोठं' विधान, काँग्रेसबाबत राऊत म्हणालेत...

सुमित बागुल

मुंबई - मार्च महिन्यापासून देशावर घोंगावणारं कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दररोज सापडतायत. मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबईतील परिस्थिती आवाक्यात जरी असली तरीही कोरोनाची टांगती तालावर मुंबईवर अद्याप आहेच. अशात मुंबईच्या आसपासच्या  उपनगरांमध्ये कोरोना प्रमाण आटोक्यात असल्याचं चित्र आहे.

कोरोना लॉकडाऊन लागल्यापासून, म्हणजे गेले अनेक महिने बंद असलेली मंदिरं खुली करण्याची मागणी आता जोर धरतेय. येत्या काळात मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन देखील केलं जाणार आहे. दरम्यान राज्यातील मंदीरं खुली करण्याबाबत आज संजय राऊत यांनी सूचक संकेत दिलेत. 

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील मंदिरं कधी खुली करण्यात येतील असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर राज्य सरकारकडून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विचार होऊ शकतो, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलंय. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी जिम बाबतचाही निर्णय सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो असं म्हटलंय.  

संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला तेंव्हा राऊतांनी विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. काँग्रेसमध्ये जे घडलं त्यावर काँग्रेस नेत्यांनी बोलायला हवं , मी काय बोलू अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. काँग्रेस विरोधी पक्ष आहे. अनेक वर्ष कॉग्रेस सत्तेत होता. काँग्रेसने अनेक वर्ष या देशाला प्रधानमंत्री दिलेले आहेत. मला असं वाटतं देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेस आजही गाव गावात असल्याने काँग्रेसने वादळातून सावरत पुन्हा काम सुरु करावं असं मत राऊत यांनी मांडलं.   

sanjay rauts statement on decision regarding opening temples in the state

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

SCROLL FOR NEXT