Adani Airports
Adani Airports 
मुंबई

मुंबई विमानतळावर पुन्हा लागणार शिवाजी महाराजांच्या नावाचा बोर्ड

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumabi internation airport) अदानी ग्रुपने (Adani Group) आपल्या ब्रॅण्डिंगचे बोर्ड बदलण्याचे काम सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून अदानी ग्रुपने अदानी विमानतळ अशा नावाचे फलक विमानतळ परिसरात लावल्याने संतप्त शिवसैनिकांनी (ShivaSena) सोमवारी राडा केला होता. दरम्यान, बोर्डाची तोडफोड करत विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज नावानेच ओळखले जावे, एखाद्या उद्योगपतीच्या नावाने ओळखले जाणार असेल तर मान्य नाही, अशी भूमिका शिवसेनेने मांडली होती.

त्यानंतर आता अदानी ग्रुपने विमानतळावरील अदानी विमानतळ लिहिलेले बोर्ड काढणे सुरू केले असून, आता फक्त अदानी ग्रुपचा लोगो आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाचे बोर्ड लावण्यात येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या टिकेनंतर अदानी ग्रुपने हे बदल करण्याचे काम सुरू केले आहे. 2 ऑगष्ट रोजी शिवसेनेने अदानी ग्रुपच्या व्यवस्थावकांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या.

त्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या नामफलकाचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे संबोधले जात असून, यापुढेही ही ओळख कायम रहावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT