Koshyari_Kesarkar 
मुंबई

राज्यपालांच्या विधानावर शिंदे गट नाराज; केंद्राकडं करणार तक्रार

राज्यपालांचं विधान हे मुंबईबद्दला अभ्यास नसल्याचं द्योतक असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्य शासनानंही नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांचं हे विधान राज्याचा अपमान करणार असून त्याबाबत केंद्र सरकारकडं आम्ही तक्रार करणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

केसरकर म्हणाले, राज्यपालांनी जे विधान केलं आहे ते राज्याचा अपमान करणारं विधान आहे. राज्यापाल हे संविधानिक पद असून त्यांच्यासंदर्भात केंद्र शासनाला लिहिण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळं राज्यपालांकडून पुन्हा अशी विधान येणार नाही, याबाबत केंद्र शासन त्यांना कळवू शकतं.

मुंबईसाठी केवळ दोनच समाजाचं योगदान नाही

मुंबई कॉस्मॉपोलिटन शहर आहे. इथे केवळ दोनच समाजाचं योगदान नाही, तर अनेक समाजाच मुंबईच्या विकासात योगदान आहे. यामध्ये मुंबईचं मूळ मराठीचं आहे. तसेच मुंबईच्या उभारणीत सर्वाधिक वाटा हा मराठी माणसाचाच आहे ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळं दोन समाज का? पारसी सामाजानं देखील मुंबईच्या औद्योगीत वाढीत मोठं योगदान दिलं आहे. पण एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्या योगदानाबद्दल बोलायचं असतं पण त्यांनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही, असं म्हणणे म्हणजे मुंबईबद्दला अभ्यास केलेला नाही हे द्योतक आहे, असंही केसरकर यांनी म्हटलं आहे.

मुंबई आर्थिक राजधानी का आहे? तर बहुतांश बँकांचं हेडक्वार्टर मुंबईला आहे. स्वतः रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबईत आहे. त्यामुळं आर्थिक राजधानी कशाला म्हणतात की, एकत्रित जो कर दिला जातो त्यांपैकी पूर्वी ४० टक्के हिस्सा एकट्या मुंबई शहरातून येत होता. त्यामुळं हे जे योगदान आहे ते कुठल्या एखाद्या समाजामुळं नाही तर सर्व समाज एकत्र आल्यानं झालं आहे. मुंबई केवळ लाठी आणि लोटा घेऊन लोक आले पण त्यांना या शहरानं आश्रय दिला मोठं केलं. त्यामुळं कोणीही बाहेरुन गुंतवणूक घेऊन मुंबईत आलेलं नाही, असंही यावेळी केसरकर म्हणाले.

संजय राऊतांच्या टीकेला उत्तर

राज्यपालांच्या विधानावरुन शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला जाब विचारला होता. त्यांना उत्तर देताना केसरकर म्हणाले, राज्यपालांच्या विधानाचा आम्ही शंभर टक्के निषेध करतो. याबाबत आम्ही केंद्र शासनाला कळवू की ज्यांची नियुक्ती राज्याचा घटनात्मक प्रमुख केलेली असते त्यांनी राज्याच्या भावना जपल्या पाहिजेत. त्यामुळं मुख्यमंत्री जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरुन परत येतील तेव्हा आम्ही सर्व आमदार त्यांना भेटून चर्चा करु. मुख्यमंत्री याची निश्चितच दखल घेतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT