माथाडी कामगाराचा प्रामाणिकपणा; महिलेची 18 हजारांची रक्कम केली परत! 
मुंबई

माथाडी कामगाराचा प्रामाणिकपणा; महिलेची 18 हजारांची रक्कम परत केली

दिनेश गोगी

उल्हासनगर : उल्हासनगरातील एका माथाडी कामगाराने आपला प्रामाणिकपणा दाखवत 18 हजार रुपये रोख असलेली हात बॅग पोलिसांकडे परत केली आहे. पोलिसांनी ही बॅग संबंधित महिलेला सुपूर्द केली असून, या कामगाराच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी त्याचा सत्कार करून शाबासकी दिली आहे.

मंगळवारी (ता.4) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास माथाडी कामगार शेखर उज्जैनवाल हे कामावरून घरी जात होते. त्यांना शहिद जनरल अरुणकुमार वैद्य टाऊनहॉलसमोरील रस्त्यावर एक हात बॅग पडलेली दिसली. ही बॅग त्यांनी खोलून पाहिली असता त्यात 18 हजार रुपयांची रक्कम, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना व मोबाईल फोन होता. शेखर याने क्षणाचाही विलंब न लावता बाजूलाच असलेले मध्यवर्ती पोलिस ठाणे गाठून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्याकडे बॅग दिली. 

पोलिसांनी महिलेच्या मोबाईलवरून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून व बॅग घेऊन जाण्यास बोलावले. बॅग हरवलेल्या महिलेचे नाव वनिता कार्य असून त्या उल्हासनगरातील गोल मैदान भागात राहतात. स्कुटीच्या पायथ्याशी बॅग ठेवलेली होती. ती कधी पडली हे त्यांच्या लक्षात आले नाही. मात्र शेखर उज्जैनवाल यांच्या प्रामाणिकपणामुळे वनिता कार्य यांना पोलिसांकरवी ही बॅग परत करण्यात आली. शेखर यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी सत्कार करून कौतुक केले आहे.

-----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT